Marathi Nibandhs

माझा आवडता सण होळी मराठी निबंध | maza avadta san holi essay in marathi | marathi essay on holi, माझा आवडता सण होळी मराठी निबंध | maza avadta san diwali essay in marathi | marathi essay on holi, आपल्या देशात खूप सण साजरे केले जातात आणि त्या मधे माझा सर्वात आवडता सण आहे होळी. नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता सण होळी मराठी निबंध , maza avadta san holi essay in marathi , marathi essay on holi वर निबंध बघणार आहोत. , होळी १, हे निबंध सुधा जरूर वाचवे :-, होळी २.

होळीला रंगांचा उत्सव  म्हणून ओळखले जाते. लोक एकमेकांना रंगात पांघरुण घालून हा आनंदोत्सव साजरा करतात. होळी रंगांचा उत्सव हिवाळ्यानंतर वसंत ऋतू मध्ये येतो. होळी साधारणत: मार्च महिन्यात साजरी केली जाते. होळी हा मुख्यतः हिंदू उत्सव आहे परंतु भारतातील बरेच लोक हा धर्मची पर्वा न करता उत्साहाने साजरे करतात. काही लोक असेही म्हणतात की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय राधाबरोबर होळी खेळली तेव्हा होळी खेळायला प्रथम सुरुवात झाली.

होळीच्या आदल्या दिवसापूर्वी छोटी होळी (लहान होळी) चा सण अलाव पेटवून आणि शेंगदाणे, पॉपकॉर्न वगैरे आगीत टाकून साजरा केला जातो. छोटी होळी नंतरचा दिवस म्हणजे सर्व प्रकारच्या रंगांमध्ये आणि आनंदाने साजरा करण्याचा दिवस. होळीच्या दिवशी कित्येक खास मिठाई तयार केल्या जातात आणि त्यातील सर्वात गुजिया खाल्ली जाते.

भारताच्या विविध राज्यांत, त्या राज्याच्या संस्कृती आणि परंपरेनुसार  होळी वेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. होळी हा आनंदाचा सण आहे आणि आपल्या कुटुंबातील आणि मित्रांमध्ये आनंद आणि प्रेम पसरवण्यासाठी साजरी करतात. त्यामुळे   होळी   हा  माझा  आवडता   सण   आहे

टीप : वरील   निबंधाचे   खालील   प्रमाणे   शिर्षक   असु शकते

Essay on  holi in marathi maza avadta san holi my favorite festival holi in marathi होळी वर मराठी निबंध . holi information in marathi holi nibandh marathi marathi essay on holi festival.

' class=

Related Post

Majha Nibandh

Educational Blog

Holi essay in Marathi

होळी या सणावर उत्तम निबंध मराठी Holi Essay in Marathi

Holi essay in Marathi, 5 10 points lines on holi in Marathi, Maza avadta san holi essay, my favourite festival holi in marathi for students for class 1,2,3,4,5

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. त्यामध्ये होळी हा सण खूप उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. होळी या सणाला शिमगा असेही बोलले जाते. ग्रामीण भागामध्ये शिमगा अतिशय उत्साहाने साजरी केला जातो. गावातील सर्व लोक वाळलेली लाकडे एकत्र करून गावातील मुख्य ठिकाणी संध्याकाळच्या वेळी एकत्र करून पेटवात, यालाच होली पेटवणे असे म्हणतात.

गावातील सर्व महिला पुरुष लहान थोर माणसे एकत्र येऊन होळीला नारळ व पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात. नारळ व पुरणपोळीचा नैवैद्य दाखवल्यानंतर होळी भोवती प्रदक्षिणा घालून पैशाचे नाणे होळी मध्ये टाकतात व होळी भोवती प्रदक्षिणा घालत जोर जोराने बोंबलतात.

गावातील महिला परंपरेने होळीची पुजा करतात होळीला नैवैद्य, खोबर्‍याचा टुकडा, नाणे, हळद कुंकू वाहतात, आणि आपल्या लहान मुलांसोबत होळी समोर नतमस्तक होतात. वयस्कर मंडळी तर होळी दिवशी अगदी उत्साहाने होळी पेटवण्यासाठी होळी समोर हजर राहतात.  

होळी म्हणजेच रंगांचा सण यामध्ये विविध प्रकारचे रंग वापरले जातात. होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते, वाईट विचार खराब दृष्टी या सर्वांचा नाश करून चांगले विचार धारण करणे हा या पाठीमागचा उद्देश असतो.

Holi Essay in Marathi

त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. होळीला नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक सणाच्या पाठीमागे काहीतरी कारण असतेच तसे होळीच्या पाठीमागे सुद्धा एक इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता तो खूप अहंकारी होता. तो त्याच्या आयुष्यात देवांना सुद्धा जास्त महत्व देत नव्हता पण त्याचा मुलगा प्रल्हाद देवांचा देव विष्णू देव यांचा खूप मोठा भक्त होता, हे त्या हिरण्यकश्यपू राजाला पाहवत न्हवते.

त्याने त्याच्या मुलाला खुप सांगितले तरीही भक्त प्रल्हाद विष्णू देवाची भक्ती करत असे. वैतागून हिरण्यकश्यपू राजाने एक योजना आखली त्याने आपली बहीण होलिका हिला अग्नी वरती चालायचे वरदान होते.

Holi essay in Marathi

हिरण्यकश्यपूने प्रल्हाद ला सांगितले तुझी एवढीच विष्णू वरती भक्ती आहे तर तू तुझी आत्या होलिका तिच्यासोबत अग्नी वरती बसुन दाखव असे म्हटल्यांनतर प्रल्हाद आपली विष्णु वरची भक्ति सिद्ध करण्यासाठी आपली आत्या होलिका सोबत अग्नी वरती बसला आणि नारायण नारायण असा जप करू लागला पण अचानक होलिका अग्नीमध्ये दहन होऊ लागली आणि अग्नि भक्त प्रल्हादला काहीच करू शकली नाही.

होलिका अग्नि मध्ये दहन झाली कारण तिला वरदान देत असताना देवाने सांगितले होते वरदानाचा चुकीचा वापर केल्यास तुझी अग्निपासून वाचण्याची शक्ति नाहीसी होईल आणि तसेच झाले. त्यामुळे ती दहन झाली व प्रल्हादाला काहीच झाले नाही त्यामुळे होळी या सणा दिवशी आपल्या मनातले वाईट विचार बाहेर टाकून चांगली वृत्ती धारण करावी असा यामागचा उद्देश आहे.

होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन त्यादिवशी रंगाने होळी साजरी करतात एकमेकांच्या अंगावरती पाणी टाकून रंग टाकून एकमेकांना रंगाने भरवतात. पिचकारी मध्ये रंग भरून लहान मुले तर दिवसभर आपल्या मित्र मैत्राणींच्या अंगावरती रंग टाकतात.

होळी हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. त्यादिवशी एकमेकांच्या मागे पळून रंग लावायला एक वेगळीच मजा येते. होळी आली की बाजारामध्ये अनेक प्रकारचे रंग तसेच सणाचे साहित्य विकण्यास येते. या सणाला रंगांचा सण असे म्हणतात लहान मुले तर एक आठवडाभर हा सण साजरी करतात त्यांना खूप मजा वाटत असते त्यांना पूर्ण भिजून हसत-खेळत आनंद घ्यायला खूप भारी वाटते.

होळी हा सण जवळ आला की आमच्या शाळेला सुट्टी नक्की असते. होळीच्या सुट्टी दिवशी आमच सुट्टी कशी साजरी करायची याच नियोजन अगोदरच ठरलेलं असत. मग सर्व मित्र मैत्रणी कुठे एकत्र यायचं, होळी हा सण दरवर्षी पेक्षा वेगळ्या पद्धतीने कसा साजरी करायचा याच सर्व नियोजान आम्ही करू लागतो.

होळी जवळ आली की आम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो, आईच्या हातचा पुरणपोळीचा स्वयंपाक खायला मिळतो, दूध, गुलाबजाम, तसेच आळूच्या पानाच्या वड्या असे अनेक नवीन पदार्थ खायला मिळतात. होळी या सणाला आपल्या भारतीय संस्कृती मध्ये खूप महत्व आहे, दिवाळी, दसरा या सणाप्रमाणेच हा सण सुद्धा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.

सूचना : “ Holi essay in Marathi ” हा निबंध आवडल्यास आपल्या मित्रांसोबत WhatsApp व Facebook वर नक्की शेयर करा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मराठी खबर – ताज्या बातम्यांचा अचूक वेध घेणारं मराठी संकेतस्थळ

शिमगोत्सव । कोकणातील खेळे, नमन, पालखी आणि होळी

मराठी खबर | मार्च 14, 2021 मार्च 14, 2021 | सामाजिक

“हाय रे हाय आणि … च्या जीवात काय नाय रे… होलियो!” संचारला ना अंगात उत्साह?

हे शब्द कानावर पडले की कोकणी माणसाच्या अंगात काही वेगळंच बळ संचारतं.

ढोल ताशांचे आवाज कानात घुमू लागतात.

डोळ्यांसमोर गुलालाच्या गुलाबी रंगात न्हावून गेलेला आसमंत दिसू लागतो.

आपले देव साक्षात आपल्या दारी येतायत ही भावना मनामध्ये एका विलक्षण ऊर्जेची निर्मिती करते.

देवाला घातलेल्या गाऱ्हाण्यांचे स्वर कानी रेंगाळू लागतात.

संकासुर, खेळे, गोमू, दशावतार, नमन आणि मृदूंगावर पडणारी लयबद्ध थाप सगळं काही क्षणात डोळ्यासमोर थैमान घालू लागतं.

Shimgotsavatil Sankasur, शिमगोत्सवातील संकासुर

होळीला मारल्या जाणाऱ्या बोंबांचा थाट काही वेगळाच!

खरंच शिमगा म्हटलं एका उत्साहपूर्ण वातावरणाची, एका नव्या जल्लोषाची पाने प्रत्येक कोकणी माणसाच्या आयुष्याला जोडली जातात.

अशा अनेक अविस्मरणीय आठवणी प्रत्येक जण साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. 

तुम्ही म्हणाल फक्त कोकणी माणसाचाच उल्लेख का?

बरोबर आहे, कारण या उत्सवासाठी कोकणी माणूस जेवढा उत्साही असतो तेवढा क्वचितच दुसरा कोणी असेल. 

गणपती आणि शिमगा हे दोन सण कोकणी माणसाच्या आयुष्यातील हवेहवेसे वाटणारे सण आहेत. 

या सणांमध्ये कामधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले चाकरमानी आवर्जून गावची वाट धरतात.

एक वेळ चार पैसे कमी भेटले तरी चालतील पण शिमग्याला गावी नक्की जायचं असं काहीसं असतं त्यांचं. असणारच कारण शिमगा म्हटलं की जे नवचैतन्य वातावरणात भरलेलं असतं त्याची ओढ प्रत्येक कोकणी माणसाला असते.  

तसं पहायला गेलं तर हा सण देशाच्या विविध भागात होळी म्हणून साजरा केला जातो.

देशभर एकच दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या सणात होलिका दहन करून रंग उधळले जातात, एकमेकांना रंग लावले जातात.

परंतु कोकणात मात्र या सणाचा काही वेगळाच थाट आहे.

शेतीची कामे संपलेली असतात आणि पेरणीची कामे सुरु होण्यासाठी अजून बराच अवधी बाकी असतो.

बळीराजाला शेतीच्या कामांमधून थोडीशी विश्रांती मिळालेली असते. या पार्श्वभूमीवर सर्व थकवा दूर करून नवीन उत्साह भरण्याचे काम हा सण करतो. 

प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळीचा मुख्य सण असतो.

विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा सण मोठ्या थाटात उत्साहाने केला जातो.

हा उत्सव म्हणजे ग्रामदेवतांच्या उत्सव असतो.

पाच ते पंधरा दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात होळीच्या मुख्य सणाच्या काही दिवस अगोदर होते.

सुरुवातीला देवाची रूपे रूपे लावली जातात. रूपे लागल्यानंतरच पालख्या गावोगावी नेण्यास परवानगी असते. पालखी हे या शिमगोत्सवात प्रमुख आकर्षण असते.

Palakhi Rupe Gramdevateche Mukhavate, पालखी रूपे ग्रामदेवतेचे मुखवटे

पालखीत बसून आपले देव आपल्या दारी येतात अशी प्रत्येक कोकणवासीयांची श्रद्धा आहे.

काही गावांमध्ये वेगवेगळ्या गावांच्या पालख्या एकमेकांना भेटण्यासाठी एकत्र येतात.

दोन ग्रामदेवतांच्या भेटीचा हा अभूतपूर्व सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात. 

खेळे आणि गोमू (Kokanatil Khele Naman)

Shimagotsavatil Khele Aani Gomu, शिमगोत्सवात खेळे आणि गोमू

प्रत्येक गावांत वेगवेगळ्या प्रथेप्रमाणे हा सण साजरा केला जातो.

काही गावांमध्ये देवाची रूपे लागल्यानंतर गावातील मुख्य देवस्थानापाशी सर्व मंडळी जमा होतात.

काही ठिकाणी मुख्य देवस्थानाला मांड असे संबोधले जाते.

गावातील पुरुषमंडळी एकत्र येऊन वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरी पारंपरिक नृत्य सादर करतात. त्यांना खेळे असे म्हणतात.

मुख्य देवस्थानावर म्हणजेच मांडावर देवाला गाऱ्हाणे घालून नंतरच खेळे गावाबाहेर पडण्याची प्रथा आहे.

गाऱ्हाणे घालण्याचा मान हा त्या गावचा गावकार किंवा मानकरी व्यक्तीला असतो.

खेळ्यांमध्ये  संकासुर, कोळीण आणि थेर अशी पात्र समोर नृत्य करतात तर बाकीची मंडळी त्यांच्या मागे उभे राहून पारंपरिक गाण्यांवर ठेका धरतात.

संकासुर, कोळीण आणि थेर यांची एक विशिष्ट वेशभूषा असते. तर मागे ठेका धरणाऱ्या मंडळींचीही वेगळी वेशभूषा असते.

यातील दुसरा प्रकार असतो तो म्हणजे गोमू. यामध्ये एका पुरुषाला स्त्रीची वेशभूषा केली जाते.

हा स्त्रीपात्र भूषवणारा पुरुष समोर नृत्य करतो तर बाकीची मंडळी त्याला मागे उभे राहून पारंपरिक लोकगीतांवर साथ देतात.

गोमूचा नाच पाहण्यासाठी अबालवृद्ध खूप उत्साहाने गर्दी करतात. 

नमन/दशावतार (Kokanatil Naman/Dashavatar)

Shimagotsav Konkanatil Naman, शिमगोत्सव कोकणातील नमन

कोकणातील शिमग्याचे प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे नमन किंवा दशावतार.

गावातील मंडळी एकत्र येऊन नाटक वजा कार्यक्रम सादर करतात, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याला नमन तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याला दशावतार म्हणतात.

यामध्ये वेगवेगळे देवी देवता, नारदमुनी, इंद्र देव, शंकर, श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी यांसारखी पौराणिक पात्रे मंचावर साकारली जातात.

यातील विशेष बाब म्हणजे श्रीकृष्णांच्या बाललीलांचे सादरीकरण करताना गवळणींची पात्रे ही साकारली जातात.

गवळणींची ही स्त्री पात्रे पुरुषच साकारतात आणि आपल्या अभिनयाने त्या पात्रांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात.

श्रीकृष्णाचे सवंगडी पेंद्या, सुदामा आणि बोबड्या कॉमेडी पात्रे दाखवण्यात येतात. आपल्या निखळ विनोदाने आणि विनोदी अभिनयाने ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नमनाच्या सुरुवातीला श्रीकृष्णांच्या बाललीला, पेंद्या बॊबड्याची अफलातून कॉमेडी आणि कंस वध हे सादर करण्याची प्रथा आहे.

त्यानंतर पुराणातील एखाद्या कथेचं सादरीकरण करण्यात येते. त्याला वग असे म्हणतात.

हा वग साधारणपणे वाईटावर चांगल्याच विजय या संकल्पनेवर आधारित असतो.

Dashavtar Patre, दशावतार पात्रे

या कार्यक्रमातील नृत्य, गाणी यामध्ये एक वेगळीच मजा असते.

साधारणपणे पाच ते पंधरा दिवस चालणाऱ्या शिमगोत्सवामध्ये हे कार्यक्रम होतच असतात.

वेगवेगळ्या गावातील मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने नमन सादर करतात.

या नमनाची उत्सुकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लागलेली असते. 

पालखी सोहळा 

Palakhi Nrutya, पालखी नृत्य

देवाची रूपे लागल्यानंतर पालखी बाहेर काढली जाते.

काही गावांमध्ये होळी झाल्यानंतर पालखी गावोगावी फिरते.

यावेळी ग्रामदेवतेचे मुखवटे पालखीमध्ये स्थापन केले जातात.

पालखीला छान अशी आरास करून गावातील प्रत्येकाच्या घरी फिरवली जाते.

ज्यादिवशी पालखी येणार आहे त्या दिवशी अंगणामध्ये सडा सारवण घालून ग्रामदेवतेच्या आगमनाची तयारी केली जाते.

सुहासिनी ग्रामदेवतेची ओटी भरतात. नवस बोलले जातात. कुटुंबाच्या सुखसमाधानासाठी गाऱ्हाणी घातली जातात.

यादिवशी घरामध्ये गोडधोड पदार्थ केले जातात.

पालखी सोहळ्यातील सर्वांत अभूतपूर्व क्षण म्हणजे पालखी नृत्य.

गावकरी मंडळी ढोल ताशाच्या गजरात आपल्या ग्रामदेवतेच्या पालखीला खांद्यावर घेऊन नाचवतात.

ढोल ताशांच्या तालावर वेगवेगळ्या पद्धतीने पालखी नाचवण्याची मजा काही वेगळीच असते.

Dhol Tashancha Gajar, ढोल ताशांचा गजर

आपल्या ग्रामदेवतेची पालखी किमान एकदातरी नाचवावी असे प्रत्येक कोकणवासियाचे स्वप्न असते.

काही ठिकाणी पालखी नृत्याच्या स्पर्धा घेतल्या जातात.

Bhavik Holi Nachavtana, भाविक होळी नाचवताना

फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी साजरी केली जाते.

या दिवशी होम पेटवला जातो.

आंब्याच्या झाडाची किंवा सुरमाडाची होळी केली जाते.

साधारणपणे २० ते २५ फूट लांब आणि ५०० ते ६०० किलो वजन असणाऱ्या या होळीला गावकरी आपल्या हाताने उचलून सहाणेपर्यंत आणतात.

सहाण म्हणजे होळी उभी करण्याची जागा.

सहाणेपर्यंत आणताना ही होळी हातांवर खेळवली जाते.

यामध्ये शेंड्याची मानकरी आणि बुंध्याचे मानकरी ठरलेले असतात.

बाकीची मंडळीही होळी खेळवण्यास मदत करू शकते.

यावेळी गुलाल उधळत असतानाच बोंबा मारल्या जातात.

“हाय रे हाय आणि … च्या जीवात काय नाय रे… होलियो!” अशाप्रकारच्या अलंकारिक भाषेत एकमेकांविरुद्ध या बोंबा मारल्या जातात.

Shimagotsavail Holi Ubhi Karatana Bhavik, शिमगोत्सवातील होळी उभी करताना भाविक

परंतु याबद्दल कोणीही वाईट वाटून घेत नाही.

खेळीमेळीच्या वातावरणात हा सण साजरा केला जातो. सहाणेवर होळी उभी केल्यानंतर होम पेटवला जातो.

त्यानंतर होळीभोवती पालखी फिरवली जाते. 

होळी साजरी झाल्यानंतर आणि पालखी प्रत्येकाच्या घरी येऊन गेल्यानंतर गावातील सर्व पुरुषमंडळी पुन्हा मुख्य देवस्थानापाशी म्हणजेच मांडावर जमा होतात. 

येथे देवाला गाऱ्हाणे घालून या सणाची सांगता होते. 

रत्नागिरीतील श्रीदेव भैरीचा शिमगोत्सव

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Amhi Marathi

५ माझा अवडता सण निबंध | 5 Maza Avadta San Essay In Marathi

Maza Avadta San Essay In Marathi माझा आवडता सण दिवाळी माहिती, माझा आवडता सण दिवाळी चित्र, माझा आवडता सण गणेशोत्सव, माझा आवडता सण होळी, माझा आवडता सण दिवाळी निबंध 10 ओळी, माझा आवडता सण चित्र, माझा आवडता सण रक्षाबंधन, दिवाळी निबंध मराठी, maza avadta san essay in marathi, maza avadta san diwali,

आनंद, परंपरा आणि सांस्कृतिक समृद्धीचा ध्वज विणत सण आपल्या हृदयात एक विशेष स्थान ठेवतात. या लेखात, आम्ही ज्वलंत वर्णने आणि अंतर्दृष्टीपूर्ण अन्वेषणांद्वारे माझा अवडता सण (Maza Avadta San Essay In Marathi) च्या साराचा शोध घेत आहोत.

मराठी साहित्य हा सांस्कृतिक समृद्धीचा खजिना आहे आणि “माझा अवडता सण निबंध मराठीत” हा वैयक्तिक आवडीनिवडींचा मनमोहक शोध आहे. या लेखात, आम्ही वैयक्तिक अनुभव प्रतिबिंबित करणारा अर्थपूर्ण निबंध तयार करण्यासाठी मौल्यवान अंतर्दृष्टी आणि टिपा प्रदान करून, या अभिव्यक्त शैलीच्या हृदयाचा अभ्यास करतो.

Table of Contents

Maza Avadta San Essay In Marathi

माझा अवडता सण दिवाळी | maza avadta san diwali.

दिवाळी, ज्याला दिव्यांचा सण म्हणूनही ओळखले जाते, हा एक नेत्रदीपक उत्सव आहे जो सर्व समुदायांमध्ये आनंद आणि सकारात्मकता पसरवतो. दिवाळीचे महत्त्व केवळ त्याच्या धार्मिक मुळांमध्येच नाही तर लोकांवर झालेल्या खोल सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभावातही आहे.

जसजसा सण जवळ येतो तसतसे घरांची संपूर्ण साफसफाई केली जाते, जे शारीरिक आणि मानसिक गोंधळ दूर करण्याचे प्रतीक आहे. दिवे, रांगोळी आणि दोलायमान दिव्यांनी घरांची बारकाईने केलेली सजावट शेजारच्या परिसराला सौंदर्याच्या मोहक क्षेत्रात रूपांतरित करते. चमकणारे दिये अंधार आणि अज्ञान दूर करणारे आंतरिक प्रकाशाचे प्रतिनिधित्व करतात.

ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून पूज्य असलेल्या देवी लक्ष्मीच्या भोवती दिवाळीच्या दरम्यान विधी आणि प्रार्थना. पुढील वर्ष भरभराटीचे जावो यासाठी कुटुंबे एकत्र येऊन पूजा करतात. उदबत्तीचा सुगंध आणि मधुर मंत्र शांतता आणि भक्तीचे वातावरण निर्माण करतात.

दिवाळीतील सर्वात अपेक्षित पैलू म्हणजे फटाके फोडणे. रात्रीचे आकाश प्रकाश आणि रंगाच्या चमकदार प्रदर्शनांसाठी कॅनव्हास बनते, वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिध्वनी करते. तथापि, अलीकडच्या काळात, फटाक्यांच्या पर्यावरणीय परिणामांबद्दल जागरूकता वाढत आहे, ज्यामुळे अधिक पर्यावरणास अनुकूल उत्सव साजरे करण्याची मागणी होत आहे.

कुटुंब आणि मित्रांमध्ये भेटवस्तू आणि मिठाईची देवाणघेवाण बंध मजबूत करते आणि एकत्रतेची भावना वाढवते. दिवाळी, त्यामुळे धार्मिक सीमा ओलांडून, प्रेम, प्रकाश आणि सौहार्दाचा सार्वत्रिक संदेश देते.

माझा अवडता सण नवरात्री आणि दुर्गा पूजा | Maza Avadta San Navratri

नऊ रात्रींचा कालावधी असलेला नवरात्र हा सांस्कृतिक उत्सवांचा एक कॅलिडोस्कोप आहे जो दैवी स्त्री शक्तीचा सन्मान करतो. उत्सवाची सुरुवात उत्कट प्रार्थनेने होते आणि उत्साही नृत्य उत्सवाने समाप्त होते. नवरात्रीचे उत्साही नृत्य, जसे की गरबा आणि दांडिया, सर्व वयोगटातील लोकांना भक्तीच्या आनंदी अभिव्यक्तीमध्ये एकत्र आणतात

पश्चिम बंगाल आणि भारताच्या इतर भागांमध्ये, नवरात्रीचा कळस दुर्गा पूजेद्वारे चिन्हांकित केला जातो, जो महिषासुर राक्षसावर देवी दुर्गाच्या विजयाचा एक भव्य उत्सव आहे. विस्तृत पँडल (तात्पुरती रचना) घरामध्ये देवीच्या गुंतागुंतीच्या मूर्ती आहेत, प्रत्येक कारागीरांच्या कौशल्याचा आणि सर्जनशीलतेचा दाखला आहे.

दुर्गापूजा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही; संगीत, नृत्य आणि कला दर्शविणारी ही सांस्कृतिक कलाकृती आहे. मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपारिक ढोल-ताशांच्या गजराने रस्ते जिवंत होतात. ही अशी वेळ आहे जेव्हा समुदाय अभ्यागतांसाठी त्यांचे अंतःकरण आणि घरे उघडतात, एकता आणि सर्वसमावेशकतेची भावना वाढवतात.

हा सण महिलांच्या सक्षमीकरणावर भर देतो, देवी दुर्गा सामर्थ्य, धैर्य आणि करुणेला मूर्त रूप देते. त्यामुळे नवरात्री आणि दुर्गा पूजा सांस्कृतिक देवाणघेवाण, अडथळे दूर करण्यासाठी आणि विविध समुदायांमध्ये समजूतदारपणा वाढविण्याचे व्यासपीठ बनतात.

माझा अवडता सण दसरा | Maza Avadta San Dussehra

दसरा, नवरात्रोत्सवाचा कळस, हा दुर्गुणांवर सद्गुणाचा प्रतिकात्मक विजय आहे. राक्षस राजा रावणावर भगवान रामाच्या विजयाची कथा धार्मिकता आणि वाईट यांच्यातील चिरंतन संघर्षाचे रूपक म्हणून काम करते.

उत्सवाचे महत्त्व केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित नाही तर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रदर्शनापर्यंत विस्तारित आहे. रावण, त्याचा भाऊ कुंभकर्ण आणि मुलगा मेघनाद यांचे पुतळे अतिशय बारकाईने तयार केले जातात आणि नंतर भव्य सार्वजनिक प्रदर्शनात जाळले जातात. हे नाट्यमय कृती एक शक्तिशाली स्मरण करून देते की वाईट कितीही भयंकर वाटत असले तरी शेवटी चांगल्या शक्तींद्वारे त्याचा पराभव केला जाईल.

दसरा आत्मनिरीक्षण आणि आत्म-सुधारणा देखील प्रोत्साहित करतो. हे व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या जीवनावर विचार करण्यास प्रवृत्त करते, वैयक्तिक भुते ओळखणे आणि त्यावर मात करणे. त्यामुळे हा सण नूतनीकरणाचा आणि नैतिक मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीची पुष्टी करण्याचा काळ बनतो.

दसऱ्याच्या दरम्यान सामुदायिक उत्सव सौहार्द आणि एकतेची भावना निर्माण करतात. आनंद आणि विजयाची सामूहिक भावना आपुलकीची भावना वाढवते आणि धार्मिकता आणि न्यायाच्या सामायिक मूल्यांना बळकट करते.

माझा अवडता सण होळी | Maza Avadta San Holi

होळी, ज्याला अनेकदा रंगांचा सण म्हणून संबोधले जाते, हा एक आनंदी उत्सव आहे जो सामाजिक सीमांच्या पलीकडे जातो आणि निर्बंधित आनंदाला प्रोत्साहन देतो. हा चैतन्यशील उत्सव केवळ रंगीत पावडरच्या खेळकर फेकण्याबद्दल नाही तर त्याचे सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक महत्त्व देखील आहे.

होळी वसंत ऋतूचे आगमन, नूतनीकरण आणि कायाकल्पाचा हंगाम दर्शवते. सणाचे उत्साही रंग जीवनातील विविधतेचे आणि विविधतेतील एकतेच्या सौंदर्याचे प्रतीक आहेत. सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीचे लोक उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात, मानवी अस्तित्वाचे कॅलिडोस्कोप प्रतिबिंबित करणारे रंगांचे मोज़ेक तयार करतात.

खेळकरपणे रंगांची उधळण हा केवळ आनंददायी क्रियाकलाप नाही; सामाजिक अडथळे तोडण्याचे हे एक रूपक आहे. होळीच्या दिवशी, पारंपारिक पदानुक्रम विरघळतात आणि सर्वजण रंगांच्या मिठीत समान होतात. त्यामुळे हा सण सर्वसमावेशकतेला चालना देतो, समता आणि बंधुत्वाची भावना वाढवतो.

आनंदाच्या पलीकडे, होळी क्षमा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सखोल संदेश देते. प्रल्हाद आणि होलिकाची आख्यायिका स्मरणपत्र म्हणून काम करते की विश्वास आणि चांगुलपणा शेवटी विजयी होईल. म्हणून, होळी, वैयक्तिक नातेसंबंधांवर चिंतन करण्याचा आणि प्रेम आणि एकतेच्या चिरस्थायी भावनेचा उत्सव साजरा करण्याचा काळ बनतो.

माझा अवडता सण कृष्ण जन्माष्टमी | Maza Avadta San Krishna Janmashtami

कृष्ण जन्माष्टमी हा भगवान कृष्णाच्या दैवी अवताराचा उत्सव आहे, कर्तव्य, नीतिमत्ता आणि भक्ती या त्यांच्या शिकवणींसाठी आदरणीय व्यक्ती. या उत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक असे दोन्ही महत्त्व आहे, जे भाविक आणि उत्साही यांचे मन मोहून टाकते.

दिवसाची सुरुवात उपवास, प्रार्थना आणि भक्तीगीतांनी होते जी भगवान कृष्णाचे जीवन आणि शोषणे सांगते. मंदिरे आणि घरे फुलांनी आणि सजावटींनी सुशोभित केली आहेत, दैवी उत्सवाचे वातावरण निर्माण करतात. मध्यरात्री उत्सव कृष्णाच्या जन्माचा शुभ मुहूर्त म्हणून चिन्हांकित करतात, भक्त विशेष प्रार्थना आणि विधींमध्ये गुंतलेले असतात.

“लीला” या नावाने ओळखल्या जाणार्‍या कृष्णाच्या बालपणातील मंत्रमुग्ध करणार्‍या कथा नाटके आणि सादरीकरणातून जिवंत होतात. खोडसाळपणा, प्रेम आणि दैवी हस्तक्षेपांनी भरलेल्या या कथा श्रोत्यांना मोहित करतात आणि विस्मय आणि भक्तीची खोल भावना प्रेरित करतात.

कृष्ण जन्माष्टमी हा केवळ धार्मिक उत्सवच नाही तर समुदायांना एकत्र आणणारा सांस्कृतिक उत्सवही आहे. हा सण कृष्णाच्या शिकवणींमध्ये अंतर्भूत असलेल्या सार्वभौमिक संदेशांवर चिंतन करण्यास प्रोत्साहित करतो, उच्च आध्यात्मिक मार्गाचा पाठपुरावा करण्यावर भर देतो.

निष्कर्ष | Conclusion

शेवटी, हे उत्सव केवळ वार्षिक कार्यक्रम नाहीत; ते अध्यात्म, संस्कृती आणि समुदायाच्या धाग्यांनी विणलेल्या दोलायमान टेपेस्ट्री आहेत. विधी, उत्सव आणि आनंदाच्या कृतींद्वारे ते व्यक्तींना आत्मनिरीक्षण, वाढ आणि सामायिक मानवतेची भावना प्रदान करतात. प्रत्येक सण, त्याच्या अनोख्या पद्धतीने, सांस्कृतिक वारशाच्या समृद्ध मोज़ेकमध्ये योगदान देतो जे त्यांना साजरे करणाऱ्या लोकांची विविधता आणि एकता परिभाषित करते.

  • फुलांची आत्माकथा मराठी निबंध | Fulanchi Atmakatha In Marathi Essay
  • माझी आई निबंध | Mazi Aai Nibandh In Marathi
  • होळी निबंध | Holi Nibandh In Marathi
  • गुढी पाडवा निबंध | 5 Best Gudi Padwa Nibandh In Marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Sope Nibandh (सोपे निबंध)

Header ads widget, माझा आवडता सण होळी - majha aawadta san holi - my favorite festival holi essay in marathi -वर्णनात्मक, माझा आवडता सण  होळी । majha aawadta san holi | my favorite festival holi essay in marathi..

होळी म्हणजेच रंगांचा सण. होळी म्हणजेच आपापसातील प्रेमाची उधळण. होळी म्हणजेच एकमेकांविषयी कटुता विसरून एकत्र येऊन आनंदाने साजरा करायचा सण.

होळी हया सणाला ' होलीका दहन ' किंवा ' शिमगा ' असेही म्हणतात. कोकणातील काही गावात होळीला ' शिमगो' असे म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्रात होळी हा सण खूप उत्साहाने साजरा होतो परंतु विशेष: कोकणात हा सण मोठया पद्धतीने साजरा करतात. गावागावात फाल्गुन शुक्ल पंचमीला छोटी होळी लावतात व पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी करतात. होळी मध्ये लाकडे जाळून होळी लावल्यानंतर मंत्रोच्चार करत त्या होळीभोवती ' बोंबा ' मारत गोल प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. होळी लावण्याच्या पद्धतीला कोकणात ' होम ' लागणे असे म्हणतात. 

गावोगावी होळीला ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर पहिला होम लावण्याची पद्धत आहे. त्यानंतर गावी प्रत्येक घराघरात देवींची पालखी फिरवण्याची प्रथा आहे. देवांची ही पालखी घरोघरी नेली जाते त्यावेळी ही पालखी गावातील पुरुष मंडळीनी नाचविण्याची पद्धत आहे आणि हे नृत्य बघण्यासाठी खूप गर्दी होते.

घरी येणाऱ्या पालखीचे स्वागत करण्यासाठी स्त्रिया घराला सुंदर सजवतात. घराबाहेर नक्षिमय रांगोळ्या काढल्या जातात. दारात तोरण लावले जाते. पालखीतून येणाऱ्या देवतेचे घरातील स्त्रिया ओटी भरतात. त्याचप्रमाणे होळीच्या वेळी नवस करण्याची ही प्रथा प्रचलित आहे. नवीन लग्न झालेली जोडपी आवर्जून होळीच्या होमामध्ये नारळ द्यायला जातात. घराघरातील प्रत्येक जण घरी आलेल्या देवाचे मनापासून स्वागत करून त्यांच्यापुढे नतमस्तक होतो.

'होळी रे होळी पुरणाची पोळी....' असे नेहमी म्हंटले जाते कारण या दिवशी प्रत्येक घरात स्त्रिया आवर्जून पुरणपोळी बनवितात.

जसजसे गावे बदलतात तासातश्या थोड्याश्या पद्धतीही बदलत जातात. कोकणातील चिपळूण मधील 'हॉल्टी होळी' प्रसिद्ध आहे. या वेळी दोन्ही बाजूने लोक उभे राहून एकमेकांवर जळती लाकडे फेकतात. हा तेथील होळी मध्ये खेळला जाणारा एक पारंपरिक खेळ आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्येही होळीला खूप महत्व दिले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओब्या भाजण्याची पद्धत आहे म्हणजेच नवीन आलेले पीक शेतकरी अग्नी देवतेला सादर करतो.

शहरातील होळी गावाकडील होळी पेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने साजरी करतात. शहरात काही जण आपापल्या बिल्डिंगच्या, सोसायटीच्या खाली सगळे मिळून एकत्र होळी पेटवतात आणि सगळे मिळून तिची पूजा करतात. शहरातील जीवन हे धाकाधकीचे आणि धावपळीचे असल्यामुळे गावाप्रमाणे तिथे मोठया प्रमाणात होळी साजरी होत नाही. परंतु तरीही शहरातील लोक होळी साजरी करण्याचा प्रयत्न करतात तर त्यातील काही लोक होळीच्या निम्मिताने आपापल्या गावी जातात.

होळीच्या दुसऱ्या दिवसाला ' रंगपंचमी ' असे म्हणतात. रंगपंचमीच्या दिवशी सगळे लोक आपापसातील मनमुटाव दूर करून एकमेकांना गुलाल लावतात. काही ठिकाणी ' भांग ' पिण्याचीही पद्धत आहे. रंगपंचमीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सगळे लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी करतात. विशेषत: लहान मुले या सणाचा पुरेपूर आनंद घेतात. असा हा होळीचा सण सगळे जण खूप आनंदाने साजरा करतात. परंतु हा सण आपण आनंदाने साजरा करीत असताना सर्वांनी दक्षता बाळगून राहणे खूप आवश्यक आहे कारण रंगपंचमी खेळताना एकमेकांच्या डोळ्यामध्ये रंग जाऊ नये याची आपण सर्वांनीच पुरेपूर काळजी घेतली पाहिजे नाही तर या आनंदाच्या सणाला गालबोट लागू शकते.

अशी ही होळी आपण वर्षानुवर्षे आनंदाने आणि उत्साहाने साजरी करीत राहूया आणि होळी या सणाचा आनंद अजून द्विगुणित करीत राहूया.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या.

Please do not enter any spam link into comment box.

This Blog is protected by DMCA.com

DMCA.com for Blogger blogs

  • Privacy Policy
  • Terms & Conditions

हा ब्लॉग शोधा

  • आत्मवृत्त
  • कथालेखन
  • कल्पनात्मक
  • पत्रलेखन
  • प्रश्नोत्तरे
  • माहिती
  • वर्णनात्मक
  • वैचारीक
  • व्याकरण
  • संवाद लेखन
  • सामाजिक

Popular Posts

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

Copyright (c) 2023 sopenibandh All Right Reseved

close

infinitymarathi

  • मराठी निबंध
  • उपयोजित लेखन
  • पक्षांची माहिती
  • महत्वाची माहिती
  • भाषणे
  • कोर्स माहिती

माझा आवडता सण निबंध मराठी | maza avadta san nibandh

 माझा आवडता सण निबंध मराठी | maza avadta san nibandh, माझा आवडता सण मराठी निबंध | maza avadta san essay in marathi , माझा आवडता सण होळी मराठी निबंध  maza avadta san holi nibandh in marathi.

भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशामध्ये अनेक जाती,धर्माचे पंथाचे लोक मिळून मिसळून मोठ्या आनंदाने राहतात.

भारत या देशाला म्हणजेच आपल्या देशाला उत्सवाचा देश किंवा सणांचा देश म्हणून सुद्धा ओळखले जाते.आपल्या देशामध्ये दिवाळी-दसरा गणेश उत्सव गुढीपाडवा होळी ईद याव्यतिरिक्त अनेक असे सण सर्वजण मोठ्या आनंदाने मिळून मिसळून साजरे करतात.

आपल्या देशांमध्ये उत्सव,सण साजरी करण्याची प्रथा फार पूर्वीपासून म्हणजेच आपल्या पूर्वजांना पासून सुरू आहे. व ती प्रथा आजही सुरू आहे.

होळी या सणाची काही एक  वेगळीच मज्जा आहे हा सण जसजसा जवळ येतो तसा तसा वातावरणामध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते.

होळी हा सण भारतामध्ये खूप प्राचीन काळापासून साजरा केला जातो होळी या सणा ला प्रेमाचा आणि रंगाचा सण म्हणून सुद्धा ओळखले जाते. होळी हा सण भारतामध्ये सर्वीकडे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पण या सणाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखतात.

सगळ्या प्रमाणे आमच्या कॉलनी मध्ये पण होळी हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. होळी या सणाची तयारी आम्ही होळी येण्याच्या एक हप्ता पहिले सुरू करतो. दरवर्षी नेहमीप्रमाणे होळीची काय रूपरेषा आहे? काय काय साहित्य आणावे लागेल? कोण कोणते कामे करेल? यासाठी  कॉलनी मध्ये एक सार्वजनिक मिटिंग होते. 

नंतर सर्व आपापल्या परीने वर्गणी गोळा करतात आणि प्रत्येकाला वाटून दिलेल्या कामांना लागतात. मी आणि माझे सगळे मित्र छान पैकी ग्राउंड स्वच्छ करने झाडून टाकणे. ग्राऊंडला गोल रिंगण आखणे नंतर वर्गणीतून आलेल्या पैशातून होळी साठी लागणारे साहित्य व लाकडे विकत आणणे यासारखी कामे करतो.

होळीच्या पहिल्या दिवशी सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते होळीच्या दिवशी सकाळीच होळी पेटवण्याचा जागी आम्ही चुन्याने एक मोठा गोल आखून त्यावर दगडे ठेवतो. त्यानंतर मधो मध एक खड्डा करून त्यामध्ये काही पैसे टाकतात आणि त्यावर एक मोठा खांब उभा केला जातो.

आणि मग विविध प्रकारचे लाकडे शेणाच्या गौऱ्या शेतकऱ्याकडील वाळीव इंधन इत्यादी रचून होळी तयार केले जाते. मी सुद्धा होळीमध्ये टाकायला चाकोल्या दरवर्षी तयार करीत असतो.

जशी संध्याकाळ होते तेव्हा होळी च्या मुहूर्तावर होळीचे दहन म्हणजे होळी पेटवली जाते सर्वजण होळी ची गोल गोल फिरून पूजा करतात. आणि नैवद्य चढवतात. त्यानंतर सर्वजण आपल्या जीवनातील कष्ट दुःख दूर झाली पाहिजे म्हणून होळी कडे प्रार्थना करतात. 

प्रार्थना झाल्यानंतर सर्वजण एकमेकांना प्रसाद वाटून एकमेकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतात. अशा प्रकारे होली दहनाचा कार्यक्रम केल्या जातो. दुसर्या दिवशी पहाटेच होळी वर सर्व जण आपापल्या घरून हंडे भरून पाणी आणून ठेवतात. 

होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमीचा दिवस. या दिवसाला धुलीवंदन असेसुद्धा म्हटले जाते. रंगपंचमी म्हणजे धुलीवंदन हा माझा वर्षातील सर्वात आवडता दिवस असतो या दिवसाची  मी वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो.

या दिवशी मला सर्वात जास्त आनंद होतो रंग पंचमी म्हणजे रंगाचा सण या दिवशी मी आणि माझे मित्र सकाळी लवकर उठून तयार होऊन पांढरेशुभ्र वस्त्र घालून रंग लावण्याकरिता बाहेर निघतो. सर्वात प्रथम आम्ही घरच्यांच्या मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन त्यांना रंग लावून बाहेर येतो.

रंगपंचमी म्हणजे धुलीवंदन साठी आम्ही रंग हे स्वतः तयार करीत असतो. या रंगांमध्ये आम्ही पळसाच्या फुलांपासून रंग बनवतो त्यामुळे  कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. आणि या व्यतिरिक्त आम्ही रंगामध्ये गुलालाचा वापर करतो.

रंगपंचमीच्या दिवशी सकाळी सर्वजण लवकर उठून पांढरे वस्त्र घालून परिसरात असलेल्या मैदानात एकत्र येतात, सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते ग्राऊंडमध्ये मस्तपैकी लाऊड स्पीकर चालू असते आणि सर्वजण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने एकमेकांना रंग लावत नाचत गाऊन रंगपंचमी साजरी करत असतात.

रंगपंचमी झाल्यानंतर घराकडच्या काकू आम्हाला गाट्या देतात. गाट्या हा माझा आवडीचा प्रकार आहे. नंतर मी घरी येऊन स्वच्छ अंघोळ करीत असतो. या दिवशी घराघरात मी पुरणपोळीआणि  विविध विविध प्रकारचे तळणाचे पदार्थ पकवान बनवले जाते. असा हा माझा आवडता सण होळी आहे.

होळी हा माझा आवडता सण आहे कारण या सणांमध्ये सर्वजण एकमेकांचे भांडण-तंटा विसरून पुन्हा एकदा एकत्र येतात. होळी आणि रंगपंचमीमुळे अनेकांच्या मनातील मनमुटाव दूर होतो.

होळी या सणामुळे माणसामाणसातील माणुसकीची आपुलकीची भावना वाढते रंगपंचमीच्या दिवशी आपण एका रुसलेल्या व्यक्तीला सुद्धा म्हणू शकतो आणि त्यांच्या अंगावर रंग टाकतात बुरा न मानो होली है असे म्हणून होळी साजरी करत असतो.

माझा आवडता सण  गणेशोत्सव म्हणजेच |  maza avadta san ganesh chaturthi in marathi ganesh utsav nibandh in marathi 

आपल्या देशामध्ये अनेक असे सण साजरे केले जातात पण त्यामध्ये सर्वात माझा आवडता सण  गणेशोत्सव म्हणजेच गणेश चतुर्थी आहे. गणपती बाप्पांचा हा सर्वांचा आवडता सण आणि सर्वांना प्रिय असतो. 

वर्षभर मी आणि माझे मित्र गणेश उत्सव म्हणजेच गणेश चतुर्थी ची वाट बघत असतो. गणेशोत्सव येताच वातावरणातील सर्व निराशा दूर होऊन सगळीकडे आनंदाचे खुशीचे आणि उत्साहाचे भक्तिमय वातावरण पसरते.

गणेशोत्सव हा सण भारताबरोबरच विदेशातही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतामध्ये घराघरात आणि प्रत्येक गल्लीमध्ये हा सण मोठ्या भक्तिभावाने आनंदाने साजरा करतात.

गणेशोत्सव हा सण सप्टेंबर महिन्यात म्हणजेच भाद्रपद महिन्यात येतो.या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणपती गणेश चतुर्थी किंवा गणेश जयंती असेसुद्धा म्हणतात.

माझ्या घरी पण आम्ही गणेश उत्सव मोठ्या आनंदाने दरवर्षी साजरा करतो. मी आणि माझ्या घरातील सर्व मंडळी गणेशोत्सव येण्याआधीच गणेशोत्सवाच्या विविध तयारीला लागतो.

यामध्ये घरातील गणपती बसवण्याचा करिता,  घराची छान साफसफाई केली जाते घराची साफसफाई झाल्यानंतर घराला छान रंग दिला जातो नंतर गणपती साठी आम्ही एक छान मस्तपैकी घरात डेकोरेशन करून एक आसन बनवतो. व त्याला शोभा येण्यासाठी लाइटिंग लावतो.

या सर्व सजावटीमुळे सर्व घर प्रकाशमय होते. घरामध्ये प्रसन्न वाटायला लागते  आणि घरात एक प्रकारचे भक्तीमय व उसाचे वातावरण निर्माण होते. मग आम्ही सर्वजणी गणेशमूर्ती आणण्याकरिता जात असतो. मग घरी मूर्ती आणून तिची पूजा विधी करून गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान करतो. गणपती बाप्पा घरी आल्यावर ती घरातील वातावरणात आणखीच भव्यता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. सर्व प्रकारची वातावरणातील निराशा दूर होऊन जाते.

आमच्याकडे गणपती हा अकरा दिवसाचा असतो. पाणी कोणी कोणी दीड दिवसाचा,अडीच दिवसाचा, पाच दिवसाचा गणपती बसवतात. गणपती घरी आल्यापासून सर्वजण सकाळी लवकर उठून तयार होऊन गणपतीच्या सेवेच्या कार्यामध्ये गुंग होतात. आई गणपतीसाठी फुले व दुर्वा आणते. ताई छान पैकी अंगण झाडून त्यावर सुंदर ची रांगोळी काढते. बाबा बाजारात जाऊन हार विकत आणतात. आणि मी सुद्धा त्यांच्या कामांमध्ये हातभार लावत असतो अशाप्रकारे सर्व झाली आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात.

रोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते आरती नंतर मिळणारा प्रसाद म्हणजे एक गणपतीचा आवडता पदार्थ मोदक गणपती बाप्पांना चढवला जातो. त्यानंतर तो प्रसाद सर्वांना दिला जातो. 

गणपती बाप्पा प्रमाणेच मलासुद्धा मोदक खूपच आवडतात.गणपती मध्ये मोदक खाण्याची काही वेगळीच मजा असते या दिवसाची वाट मी वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो. गणेश उत्सव हा माझा आवडता सण आहे कारण या दिवसांमध्ये घरी सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. घरी पाहुणे येतात. मित्र येतात त्यामुळे खूप मजा येते.

रोज निरनिराळे पदार्थ खायला मिळतात आणि मुख्यमंत्री शाळेत पण गणपती बसवतात म्हणून खूपच आनंद वाटतो. गणपतीचे दहा दिवस कसे आनंदात निघून जातात ते कळत सुद्धा नाही. दहाव्या दिवशी आम्ही सर्वजण सर्वांना घरी जेवणासाठी बोलवतो.

त्यानंतर जो दिवस येतो तो म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस या दिवशी मला अतिशय खूप दुःख हो ते. कारण गणपती बाप्पा आपल्या पासून दूर जातात आणि पुन्हा एका वर्षांनी परत येतात. म्हणून अतिशय मला उदास वाटते.

पण आम्ही सर्वजण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणून छान वाजत गाजत गणपतीचे मिरवणूक काढून विसर्जन करतो आणि पुन्हा एकदा गणेश चतुर्थी ची वाट बघत बसतो. असा हा माझा आवडता सण गणेश चतुर्थी आहे धन्यवाद

बैल पोळा निबंध   | maza avadta san bail pola 

जगामध्ये सर्वात जास्त सण भारतामध्ये साजरे केले जाते म्हणूनच भारताला सणाचे माहेरघर असेसुद्धा म्हटले जाते आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक मकर संक्रांति होळी दिवाळी ईद नाताळ रक्षाबंधन नागपंचमी बैलपोळा आणि इतर सण मोठ्या आनंदाने व गुनागोविंदांनी साजरा करतात. आजच्या लेखामध्ये आज आपण बैल पोळा या सणा वर निबंध बघणार आहोत तर चला मग सुरु करूया बैल पोळा हा निबंध.

बैलपोळा हा सण मुख्यत्वे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि सोबतच हा सण संपूर्ण भारतामध्ये पण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. बैलपोळा हा माझा सर्वात आवडता सण आहे. श्रावण महिन्यात एका मागे एक लागोपाठ अनेक असे सण येतात.

आणि श्रावण महिन्याच्या शेवटी बैलपोळा हा सण श्रावण महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच भाद्रपद अमावस्येला येतो. बैलपोळा सण शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा सण आहे बैल पोळा हा सण शेतकरी आपल्या बैलांच्या प्रती कृतज्ञता सन्मान आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा करीत असतात.

वर्षभर शेतामध्ये शेतकऱ्यांची शेत कामांमध्ये मदत करणाऱ्या आपल्या सर्जा-राजाचा या दिवशी आराम असतो. या दिवशी बैलाला कडून कोणतेही काम करून घेतले जात नाही.

बैलपोळा सण ज्या दिवशी असतो त्या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठून आपापल्या बैलाला छान पैकी स्वच्छ करून आंघोळ करतात. त्यानंतर बैलाला त्याच्या मन मन पसंतीचे म्हणजे आवडते खाद्य दिले जाते. 

या दिवशी प्रत्येक जण आपल्या बैलाची सेवा करीत असतो. बैलपोळ्याच्या दिवशी बैलाची खास निगा राखली जाते, या दिवशी हळद आणि तुपाचा या दिवशी बैलाचे अंगा खांद्याला शेक दिला जातो. याशेखला  खांडशेख असेसुद्धा म्हणतात.

त्यानंतर बैलाला सजवण्या करिता त्याच्या पाठीवर अतिशय सुंदर नक्षीकाम असणारी देखणी शाल त्याच्या अंगावर पांघरली जाते.आणि बैलाच्या डोक्यावर ते बाशिंगे संपूर्ण अंगाला विविध प्रकारचे ठिपके आणि गळ्यात नवी न माळ घालतात.

सर्व जण आपला बैल अधिक उठून दिसला पाहिजे म्हणून खूप मेहनत करून बैलाला सजवतात. आणिनंतर घरातील स्त्रिया त्यांची पूजा करून त्यांना पुरण पोळी तू आणि आणखी गोड-धोड पदार्थ खायला देतात.

ज्यांच्याकडे बैल नसतो ते लोक मातीच्या बैलांची पूजा करतात आणि त्यांना नैवेद्य देतात.बैलपोळ्याच्या दिवशी जो वर्षभर बैलांची काळजी घेतो म्हणजे बैलकऱ्याला नवीन कपडे घेतले जाते.व  त्याला सुद्धा गोड पदार्थ खायला देतात.

अशाप्रकारे बैलपोळा हा सण साजरा केला जातो. बैलपोळ्याच्या दिवशी रात्रीच्या वेळेला बैलांची वाजत गाजत गाऊन मिरवणूक काढली जाते.

Team infinitymarathi

Posted by: Team infinitymarathi

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या, telegram group.

Telegram Group

  • essay in marathi
  • information in marathi
  • marathi speech
  • course information in marathi
  • advertising in Marathi

गैरवर्तनाची तक्रार करा

हा ब्लॉग शोधा.

  • एप्रिल 2024 4
  • मार्च 2024 24
  • जानेवारी 2024 2
  • डिसेंबर 2023 1
  • नोव्हेंबर 2023 4
  • ऑक्टोबर 2023 3
  • ऑगस्ट 2023 2
  • जून 2023 1
  • मे 2023 1
  • एप्रिल 2023 1
  • फेब्रुवारी 2023 2
  • जानेवारी 2023 2
  • ऑक्टोबर 2022 1
  • मे 2022 4
  • एप्रिल 2022 1
  • मार्च 2022 3
  • फेब्रुवारी 2022 5
  • जानेवारी 2022 1
  • डिसेंबर 2021 2
  • नोव्हेंबर 2021 2
  • ऑक्टोबर 2021 2
  • सप्टेंबर 2021 3
  • ऑगस्ट 2021 6
  • जुलै 2021 5
  • जून 2021 8
  • मे 2021 16
  • मार्च 2021 2
  • फेब्रुवारी 2021 6
  • जानेवारी 2021 1

Social Plugin

Follow us on google news.

  • https://news.google.com/publications/CAAqBwgKMMz2owswj4G8Aw?ceid=IN:en&oc=3

Featured Post

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

click here to get information

Menu Footer Widget

  • Privacy policy
  • Terms and Conditions

My favorite festival is Holi | Maza Avadta San Holi | माझा आवडता सण होळी.

माझा आवडता सण होळी आहे.

maza avadta san essay in marathi holi

होळी, ज्याला “रंगांचा सण” म्हणूनही ओळखले जाते, हा भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. हा भारतातील आणि जगभरातील हिंदू आणि इतर धर्माच्या लोकांद्वारे साजरा केला जाणारा वसंतोत्सव आहे. होळी हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो आणि तो माझा आवडता सण आहे. या लेखात, मी तुम्हाला या सणाचे सौंदर्य आणि हा माझा आवडता सण का आहे याचे कारण जाणून घेईन.

होळी हा एक सण आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि अलिकडच्या वर्षांत याला जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. हा आनंद, प्रेम आणि एकजुटीचा सण आहे, जिथे लोक त्यांचे मतभेद विसरून एकत्र येऊन साजरे करतात. ही अशी वेळ आहे जेव्हा लोक एकमेकांना रंग देतात, ढोल-ताशांच्या तालावर नाचतात आणि गाणी गातात आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि पेये घेतात.

होळीचा इतिहास आणि महत्त्व होळीचा इतिहास प्राचीन काळापासून आहे आणि त्याच्याशी अनेक कथा आणि दंतकथा आहेत. प्रल्हाद आणि होलिकाची कथा ही सर्वात लोकप्रिय आख्यायिका आहे. प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त होता आणि त्याचे वडील, राजा हिरण्यकशिपू यांची इच्छा होती की त्यांनी त्याची पूजा करावी. प्रल्हादाने नकार दिल्यावर राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला, परंतु भगवान विष्णूने त्याचे रक्षण केले. राजाची बहीण होलिका हिला एक वरदान मिळाले ज्यामुळे तिला अग्नीपासून प्रतिकारशक्ती निर्माण झाली. राजाने प्रल्हादाला मारण्यासाठी तिच्या शक्तीचा वापर करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याऐवजी, प्रल्हादा असुरक्षित राहिला तर ती जळून खाक झाली. ही घटना होळीच्या आदल्या रात्री येणारी होलिका दहन म्हणून साजरी केली जाते.

हा सण वाईटावर चांगल्याचा विजय असल्याचे देखील सूचित करतो आणि तो भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि रीतिरिवाजांनी साजरा केला जातो. भारताच्या उत्तरेला होळी म्हणून ओळखले जाते, तर दक्षिणेला रंगपंचमी किंवा कामविलास म्हणतात.

होळी साजरी करण्याची तयारी होळीची तयारी आठवडाभर आधीच सुरू होते आणि लोक रंग, मिठाई आणि कपड्यांची खरेदी सुरू करतात. ते सणाशी संबंधित विधींची तयारीही सुरू करतात. लोक आपली घरे स्वच्छ करतात, फुलांनी आणि रांगोळीने सजवतात आणि दिवसासाठी खास पदार्थ तयार करतात.

होळीची पूर्वसंध्येला – होलिका दहन होळीची पूर्वसंध्येला, ज्याला छोटी होळी किंवा होलिका दहन असेही म्हणतात, मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. लोक आगीभोवती जमतात आणि जुने कपडे, काठ्या आणि पाने यासारख्या नकारात्मकतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोष्टी टाकतात. होलिकेच्या पुतळ्याने शेकोटी पेटवली जाते आणि लोक अग्नीभोवती गातात आणि नाचतात.

होळीचा दिवस – रंगवाली होळी होळीचा दिवस, ज्याला रंगवाली होळी किंवा धुलंडी असेही म्हणतात, हा सणाचा मुख्य दिवस आहे. लोक सकाळी लवकर जमतात आणि एकमेकांवर रंग चढवतात.

होळीचे पदार्थ आणि पेये होळी हा खाण्यापिण्याचा सण देखील आहे आणि लोक या प्रसंगी खास पदार्थ तयार करतात. काही लोकप्रिय पदार्थांमध्ये गुजिया, मथरी, दही भल्ला, चाट आणि थंडाई यांचा समावेश होतो. थंडाई हे दूध, नट आणि मसाल्यांनी बनवलेले एक पारंपारिक भारतीय पेय आहे आणि ते होळीच्या वेळी आवश्‍यक आहे.

होळीशी संबंधित लोककथा आणि दंतकथा प्रल्हाद आणि होलिकेच्या दंतकथेशिवाय होळीशी संबंधित इतर अनेक कथा आणि लोककथा आहेत. लोकप्रिय कथांपैकी एक म्हणजे राधा आणि कृष्णाची प्रेमकथा. असे मानले जाते की कृष्ण वृंदावनात आपल्या मित्र आणि प्रिय राधासोबत होळी खेळत असे. त्यामुळे होळी हा प्रेमाचा सण म्हणूनही ओळखला जातो.

भारताबाहेर होळी साजरी होळी केवळ भारतातच साजरी केली जात नाही, तर जगातील इतर भागांमध्येही याला लोकप्रियता मिळाली आहे. नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान सारख्या देशांमध्ये लोक मोठ्या उत्साहाने होळी साजरी करतात. युनायटेड स्टेट्स आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये, होळी एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून साजरी केली जाते आणि लोक रंग खेळण्यासाठी, नृत्य करण्यासाठी आणि उत्सवाचा आनंद घेण्यासाठी एकत्र येतात.

होळी हा माझा आवडता सण का आहे याची कारणे होळी हा माझा आवडता सण असण्याची अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम, हा एकजुटीचा सण आहे आणि तो लोकांना त्यांचा धर्म, जात किंवा पंथ विचारात न घेता एकत्र आणतो. दुसरे म्हणजे, हा रंगांचा सण आहे आणि मला होळीच्या वेळी उत्साही आणि चैतन्यमय वातावरण आवडते. तिसरे म्हणजे, हा खाण्यापिण्याचा सण आहे आणि मला चविष्ट पदार्थ आणि थंडाईचा आनंद मिळतो. शेवटी, हा प्रेमाचा सण आहे आणि मला तो प्रेमाचा आणि समरसतेचा संदेश आवडतो.

होळीचा आत्मा होळीचा आत्मा म्हणजे भूतकाळ विसरणे आणि मोकळ्या हातांनी भविष्याला आलिंगन देणे. क्षमा करण्याची आणि विसरण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची ही वेळ आहे. जीवन साजरे करण्याची आणि आनंद आणि आनंद पसरवण्याची ही वेळ आहे.

एकता आणि विविधतेचे प्रतीक म्हणून होळी होळी हे एकता आणि विविधतेचे प्रतीक आहे आणि ती सद्भावना आणि शांतीचा संदेश देते. हे विविध धर्म, जाती आणि संस्कृतीच्या लोकांना एकत्र आणते आणि सहअस्तित्व आणि स्वीकाराच्या संदेशाला प्रोत्साहन देते.

होळी आणि पर्यावरण होळी हा रंगांचा सण असला तरी तो पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे महत्त्वाचे आहे. अनेक पारंपारिक रंगांमध्ये हानिकारक रसायने असतात जी पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात. नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक रंग वापरणे आणि त्यांची योग्य विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • My favorite festival is Christmas | Christmas NIbandh Marathi | माझा आवडता सण ख्रिसमस.
  • Maza Maharashtra Essay | Maza Maharashtra Nibandh |माझा महाराष्ट्र निबंध मराठी.
  • My favorite festival is Eid | Maza Avadta San eid | माझा आवडता सण ईद .
  • Gudhipadwa Essay Marathi | Gudhipadwa Nibandh Marathi | गुढीपाडवा निबंध मराठी .
  • My favorite festival is Diwali | Maza Avadta San Diwali Nibandh Marathi | माझा आवडता सण दिवाळी.
  • My favorite sport is football | Maza Avadta Khel Football | माझा आवडता खेळ फुटबॉल

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Marathi Word

माझा आवडता सण | Maza Avadta San Essay in Marathi

भारत हा एक असा देश आहे, जेथे विविध जातीचे आणि धर्माचे लोक एकत्रित गुण्यागोंविंदाने राहतात, जसे कि हिंदू  मुस्लिम, सिख, इसाई आणि अधिक. हजारो वर्षांपूर्वी पासून हे लोक इथे राहत आहेत. इथे प्रत्येक धर्माची वेगळी संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीची वेगळीच परिभाषा आहे, त्यांचे विविध सण आणि प्रत्येक सणाचे एक वेगळेच वैशिष्टय आणि महत्व आहे.

भारतात दिवाळी, होळी, गणेश उत्सव, गुडी पाडवा, ईद हे सण अगदी जोमाने साजरे होतात. त्यातील माझा आवडती सण म्हणजे गुडीपाडवा.  गुडीपाडवा हा सण हिंदू धर्मात नव वर्षाचा सण म्हणून साजरा केला जातो, ह्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा करून नवनवीन कपडे परिधान केले जातात आणि त्या नंतर वेळ येते ती गुडी उभारण्याची. गुडी उभारल्या नंतर सर्वाना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांना तिळगून दिले जातात. तिळगुळ ह्यासाठी, कारण ते चवीला गोड असतात आणि नवीन वर्षाची सुरुवात ही गोडव्यानेच केली जाते.

गुडी पाडव्याच्या दिवशी आम्ही मित्र मित्र जेव्हा शाळेत वर्गात तिळगून देऊन सर्वाना गुडी पाडव्याच्या शुभेच्छा देत असतो तेव्हा आमचे एक वाक्य ठरलेलेच असते ते म्हणजे ” गुडी पाडवा आणि नीट बोल गाढव “, असे आहेत तर सामान्यच वाक्य पण मित्रांच्या गटात एक वेगळेच हास्य पसरवून जाते.

अनुक्रमणिका

गुडी पाडव्याचा इतिहास

गुडी पाडवा साजरा करण्यापाठी अनेक कारणे आणि अनेक कथा सांगितल्या जातात, अशाच काही कथांचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत.

कथा १ :- ब्रम्हा, विष्णू आणि महेश संपूर्ण सृष्टीचे पालनहार आहेत. ब्रम्ह देवाने संसाराची निर्मिती केली, विष्णू देव त्याचे पालन करतात आणि महेश म्हणजेच महादेव अथवा शिवशंकर हे पृथ्वीचे चालक आहेत. असे म्हटले जाते की पृथ्वी वर जेव्हा सजीव जीवाची निर्मिती झाली तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता, त्यामुळे हा दिवस गुडी पाडवा म्हणून साजरा केला जातो.

कथा २ :- त्रेता युगात घडलेले रामायण हे हिंदू संस्कृती मधील एक धार्मिक कथा आहे. अयोध्या नगरीचे राजा प्रभू श्रीरामचंद्र हे आपल्या वडिलांच्या वचनामुळे १४ वर्षाचं वनवास भोगण्यासाठी जंगलात रवाना होतात. तेव्हा त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सीता आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण हे देखील असतात.

जेव्हा ते १४ वर्षांचा वनवास भोगत असतात, ह्या दरम्यान त्यांची भेट शूर्पणखा ह्या राक्षसनी सोबत होते. शूर्पणखा ला प्रभू राम आवडत होते, एकदा तिने एका सुंदर महिलेचे रूप घेऊन प्रभू रामचंद्रांसमोर गेली आणि त्यांना तिच्यासोबत लग्न करण्यासाठी विचारले तेव्हा श्रीराम ह्यांनी नकार देत म्हणाले मी विवाहित आहे आणि माझ्या पत्नीचे नाव सीता आहे आणि मी तिच्या सोबतच खुश आहे, ह्या घटने नंतर तिने श्रीराम ह्यांचे भाऊ लक्ष्मण ह्यांना लग्नासाठी विचारले त्यांनीही नकार दिला ह्या दरम्यान त्यांच्या सोबत असे काही घडते कि लक्ष्मण ह्यांच्या द्वारे त्या राक्षसीणीचे नाक कापले जाते, हि गोष्ट जेव्हा शूर्पणखा च्या भावाला म्हणजेच रावणाला समजते तेव्हा रावण क्रोधीत होतो. रावण हा मुळात एक ब्राम्हण राक्षस असतो जो महापंडित म्हणून देखील ओळखला जातो ज्याची लंका हि सोन्याची होती.

आपल्या बहिणीचा सूड घेण्यासाठी रावण रामचंद्रांच्या पत्नी म्हणजेच सीता चे अपहरण करण्याचे ठरवतो आणि ते करतो देखील, ह्यादरम्यान रावण समोर अनेक अडचणी उभ्या राहतात, परंतु त्या सर्व नष्ट करत तो पुढे निघत जातो आणि शेवटी लंकेत पोहचून सीता ला नजर कैदेत ठेवतो.

ही खबर जेव्हा प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचते, तेव्हा ते क्रोधीत होऊन त्यांच्या पत्नीं सीता ह्यांना परत आणण्याचा निर्णय घेऊन वाटचाल करू लागतात, त्यांच्यासोबत महाबली हनुमान सारखे महाबलाढ्य योद्धे जुळतात आणि अथक प्रयन्तांनंतर ते आपल्या पत्नी सीता यांना वाचवण्यात यशस्वी होतोत. ह्या दरम्यान अनेक वर्षांचा कालावधी निघून जातो आणि त्यांचा १४ वर्षांचा वनवास देखील संपतो आणि ते अयोध्ये साठी प्रस्थान करतात असे म्हणतात कि ज्या दिवशी प्रभू रामचंद्र, सीता आणि त्यांचे बंधू लक्ष्मण हे ज्या दिवशी अयोद्धेयमध्ये पोहोचले त्यादिवशी त्यांचा झालेला विजय साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या विजयाचे प्रतीक दर्शविण्यासाठी अयोध्यामध्ये प्रत्येक घरात गुडी उभारण्यात आली आणि अशा प्रकारे गुडी पाडव्याचा शुभ आरंभ झाला असे सांगितले जाते.

कथा ३:- देवी पार्वतीने महादेवासोबत लग्न रचण्याची कल्पना मनात आणली आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप करू लागली. अनेक वर्ष निघून गेली आणि पार्वतीची श्रद्धा पाहून महादेव प्रसन्न झाले आणि देवी पार्वती सोबत विवाह करण्याचे वचन पार्वतीला दिले, ज्या दिवशी महादेव आणि पार्वतीचा विविह ठरला तो दिवस गुडी पाडव्याचा होता असे म्हटले जाते.

गुडी कशी उभारली जाते ?

  • प्रथम एक बांबूची काठी घ्या आणि त्याचा पाण्याने अभिषेक करा.
  • एक नवीन कपडा घ्या, साडी असेल तर अति उत्तम फक्त कोणत्याही काळ्या रंगाच्या कपड्याचा वापर करू नका कारण तो रंग अशुभ मानला जातो.
  • आता त्या कपड्याला अथवा साडीला काठीच्या वरच्या टोकाला बांधा आणि अगदी वरच्याच टोकाला पितळेचा तांब्या घाला.
  • आंब्याची पाने आणि कडुलिंबाची पाने एक धाग्यात ओवून कपड्याच्या अथवा साडीच्या अवतीभवती गुंडाळा.
  • झेंडूच्या फुलांचा हार घाला.
  • आता त्याला साखऱयांचा हार घाला.
  • हळद कुंकू लावा आणि अशा प्रकार तुमची गुडी उभारण्यास तयार होईल. हि गुडी तुम्ही दरवाजात अथवा अनेक जण खिडकि मध्ये देखील लावतात.

गुडी पाडव्याचे महत्व

गुडी पाडवा हा हिंदू संस्कृती मधून सांस्कृतिक सण असून दिनदर्शिके प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष हा एक पौराणिक ग्रंथ असून गुढी पाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त आहे, असे ह्या ग्रंथात सांगितले आहे. हिंदू धर्माची नवीन सुखमय वर्षाची सुरुवात म्हणून हा सण साजरा होतो. तसेच गुडी ला विजयाचे प्रतीक देखील मानले जाते. असे म्हणतात कि, ह्या दिवशी कोणत्याही कामाची सुरुवात हि त्या कामाला यशस्वी रित्या पूर्ण करते आणि त्यात आपल्याला विजय प्राप्त होतो.

संस्कृती जपण्याच्या हेतूने हा एक महत्वाचा सण आहे. तसेच ह्या दिवशी अनके सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात, ज्या दरम्यान अनके लोक दान धर्म देखील करतात, ज्यामुळे सामाजिक दृष्टीने देखील ह्या सणाला एक विशेष असे महत्व लाभले आहे.

गुडी पाडवा दिवशी कोणत्याही व्यक्ती सोबत भेदभाव केला जात नाही आणि चांगल्या कामाची देखील सुरुवात होते, ज्यामुळे भारतीय एकात्मतेच्या दृष्टीकोनातून देखील हा सण महत्वाचा मानला जातो.

तर, असा हा माझा आवडती सण गुडीपाडवा जो हिंदू नवीन वर्ष आणि आनंद दोन्ही एकाच वेळी घेऊन येतो.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

माझा आवडता सण मराठी निबंध | Maza Avadta San Essay in Marathi

माझा आवडता सण मराठी निबंध | Maza Avadta San Essay in Marathi

माझा आवडता सण मराठी निबंध | Maza Avadta San Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता सण मराठी निबंध | Maza Avadta San Essay in Marathi ” घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अनेक सण आहेत. प्रत्येक सणाच्या आपले काही स्वतःचे विशिष्ट धार्मिक महत्त्व आणि पौराणिक का असतात. प्रत्येक सण साजरा करण्यामागे एक आनंद ,उत्सव आणि जल्लोष असतो.

भारतात विविध सण साजरे केले जातात परंतु या सर्व शाळांमध्ये माझा आवडता सण म्हणजे ” गुढी पाडवा.”

लहानपणापासूनच मला गुढीपाडवा हा सण खूप आवडतो. कारण दारोदारी नवीन वर्षाच्या लावलेले गुढी उभारलेले असते आणि साखरेचे हार लहान मुलांना खायला मिळतात.

गुढीपाडवा हा हे भारतीय सण असून, हा सण हिंदू कालगणनेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला  म्हणजेच वसंत ऋतू च्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. आपल्या येथील नवीन वर्ष हे 1 जानेवारीपासून सुरू होत असले तरी मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा या दिवसापासून चालू होते.

गुढीपाडवा हा शालिवाहन संवत्सराचा  पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या सडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढी पाडवा या दिवशी आहे.

गुढीपाडव्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे, व्यापार चालू करणे ,  सुवर्ण खरेदी करणे, उद्योग टाकणे असे कार्य करणे शुभ मानले जातात.

गुढीपाडव्या दिवशी दारोदारी गुढी उभारली जाते आणि  ही गुढी विजयाचे प्रतीक आहे. तसेच गुढीपाडव्यापासून रामचंद्र कार्यक्रमाला सुरुवात होते. प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही पौराणिक कथा असता,त्याप्रमाणेच गुढीपाडवा सण करण्यामागे हे काही पौराणिक कथा आहेत.

असे म्हणतात की, या दिवशी भगवान विष्णूंनी संपूर्ण विश्वाची निर्मिती केली होती.  म्हणून हा दिवस गुढीपाढवा च्या रूपात साजरा केला जातो.

तसेच दुसर्‍या कथेनुसार असे लक्षात येते की ,रामाने चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून दिवशी  आयोध्यात प्रवेश केला होता. रामाने रावणाचा वध केला होता विजय प्राप्त केला होता, विजयाचे प्रतीक म्हणून सर्वांनी घरोघरी गुढी उभारून रामाचे स्वागत केले होते, म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. तसेच गुढीपाडवा या दिवसापासून रामाचे नवरात्र चालू होते, व राम नवमी या दिवशी संपते.

तसेच गुढीपाडव्याची तिसरी कथा म्हणजे, शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने च्या मुलाने शाकांचा वध करण्यासाठी मातीचे पुतळे बनवले, व या मातीचा पुतळा मध्ये  देवाने प्राण सोडले, या मातीच्या पुतळ्याच्या सणांचा वापर करून  शालिवाहन ने शाकांचा वध केला. त्यामुळे या दिवसापासून शालिवाहन कालगणना चालू असते व त्याला ‘शालिवाहन शक’ असे म्हणतात.

गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी गुढी उभारली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील लोक घरोघरी गुढी उभारतात. गुढी म्हणजेच,  उंच बांबूच्या काठीला नवीन वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, व  त्यावर कडू‌लि़बाच्या झाडाचे डाहाळे, कठीच्या वरच्या टोकाला पितळाच्या तांब्या लावतात,या  गुढीला फुलांचा हार व साखरेचा हार घालतात. व ही  गुढी न्सलेश जागेवर एक पाठ  ठेवून  त्या पाठाच्या कडेने रांगोळी काढतात.  काठीला हळद-कुंकू, अक्षदा वाहून पूजा केली जाते.

त्यानंतर पुरणपोळीचा किंवा एखादा गोड पदार्थ करून गुढीला नैवेद्य दाखवतात. प्रकारे विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेली गुढी घरोघरी उभारली जाते.

गुढीपाडवा हा दिवस  खूप शुभ मानला जातो.या दिसशी नवीन वर्षाची सुरवात होते, त्यामुळे प्रत्येक जण नवीन कार्याला सुरुवात करतात व या दिवशी घेतलेले सर्व कार्य यशस्वी होतत असे मानले जाते.

तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण एकत्र येतात, नवीन पोशाख घालतात, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. त्यामुळे एकमेकांचे प्रेम आणि सामाजिक बांधिलकी वाढली जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते, त्यामुळे सर्वजण दान करतात. त्यातून समाज कल्याण यांचे कार्य घडते. काही जण गरीब लोकांना अन्नदान ,वस्त्रदान करतात. त्यातून एक पुण्याचे  कार्य घडते.

गुढीपाडवा हा भारतातील विविध प्रांतांमध्ये विविध नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्र गुढीपाडवा म्हणतात तर, कर्नाटक मध्ये विजया दिन म्हणतात. तर सिंधी लोक गुढीपाडव्याला चेटीचंड म्हणतात.

अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणारा हा गुढीपाडवा सण मला खूप खूप आवडतो. या दिवशी मी माझ्या आई-बाबांसोबत  गरीब लोकांना अन्नदान करतो. सर्व  नातेवाईकांना फोन करून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. हे माझ्या मित्रांसोबत   मिळून मंदिरात जातो. गुढीपाडव्याच्या सणाला  आपण  गुढीला साखरेचा हार घालतो, तो हार मला खूप आवडतो.

दरवर्षी मी माझ्या आई बाबा सोबत मिळून आमच्या दारासमोर गुढी उभारतो. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व वातावरण आनंदमयी आणि प्रसन्न असते. हिंदू धर्मात महत्त्वाचा असलेला हा गुढीपाडवा सण सर्वजण मिळून आनंदाने साजरा करतात. म्हणून मला गुढीपाडवा हा सण खूप खूप आवडतो.

तर मित्रांनो ! हे सुंदर निबंध वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करायला विसरू नका.

या निबंधा मध्ये आमच्या कडून काही ( Points ) राहिले असतील तर, कमेंट ( Comment ) करून नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध
  • भारत माझा देश आहे निबंध
  • मी डॉक्टर झालो निबंध मराठी
  • माझा आवडता सण दिवाळी
  • सायकलची आत्मकथा मराठी निबंध

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

avadta sant essay in marathi

माझा आवडता संत निबंध मराठी | Maza Avadta Sant Essay in Marathi

Maza Avadta Sant Essay in Marathi:- मित्रांनो आज आपण माझा अवडता संत निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील थोर संत आणि कवी होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. 1275 मध्ये आपेगाव येथे झाला. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता. पण नंतर त्यांनी पुन्हा कौटुंबिक जगात प्रवेश केला आणि नंतर त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी चार मुले झाली.

संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका, अमृतानुभव, चांगदेवष्टी, हरिपंथाचे अभंग अशी काव्ये रचली. त्यांनी मराठी भाषेला सर्वोच्च अभिमान आणि अभिमान दिला आहे,” ज्ञानेश्वरी ” त्यांनी ज्ञानेश्वरीत 9000 कविता लिहिल्या आहेत. हे पुस्तक इसवी सन १२९० मध्ये लिहिले गेले असे मानले जाते. ‘Maza Avadta Sant Essay in Marathi’

त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे प्रतीक होते. संत ज्ञानेश्वर हे विठ्ठलाचे भक्त होते. वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी मराठीतील सर्वोत्कृष्ट ज्ञानेश्वरी ग्रंथ रचला.

ज्ञानेश्वरीला भावार्थदीपिका असेही म्हणतात. ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेचे ज्ञान प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पोहोचवले. ज्ञानेश्वरी सर्व स्तरातील लोकांना आकर्षित करते. ज्ञानेश्वरीतील सुमारे 9000 कवितांमधील भक्तीचा ओलावा अतुलनीय आहे.

Maza Avadta Sant Essay in Marathi

अनुभव अमृतानुभव हा ज्ञानसूर्य संत ज्ञानेश्वरांच्या दर्शनातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ हा स्वलिखित ग्रंथ आहे. त्यामध्ये 800 अंडाशय त्यांच्या तेजाची खोली व्यक्त करतात. असा समृद्ध आणि अनुभवी अभंग हरिपाठ रचून संत ज्ञानेश्वरांनी मराठीचा अभिमान वाढवला.

ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हे सर्वोत्तम ईश्वरस्मरणाचे नाव आहे.ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात ज्ञानदेवांनी जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना लिहिली आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या कोणत्याही सृजनात समाजाने आपल्या कुटुंबावर केलेले अत्याचार जाणवलेले नाहीत. ‘Maza Avadta Sant Essay in Marathi’

अशा महापुरुषांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवनी समाधी घेतली. तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरांचे कार्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते.संत ज्ञानेश्वरांच्या नावाने शैक्षणिक संस्था, शाळा, आश्रमशाळा स्थापन झाल्या आहेत.

प्रभात कंपनीने संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर चित्रपट बनवून ज्ञानेश्वरांचे कार्य जगभर पोहोचवले. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचे महान संत होते आणि त्यांचे महत्त्व वर्णन करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत.

संत ज्ञानेश्‍वरजींचे सुरुवातीचे जीवन खूप कष्टातून गेले, त्यांना सुरुवातीच्या आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागले. तो अगदी लहान असताना त्याला जातीवरून बहिष्कृत केले गेले, त्याच्याकडे राहण्यासाठी झोपडीही नव्हती, संन्यासीचा मुलगा म्हणून त्याचा अपमान केला गेला.

त्याचवेळी ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनीही समाजाचा अपमान सहन करून आपला जीव सोडला.त्यानंतर ज्ञानेश्वर जी अनाथ झाले पण तरीही त्यांनी घाबरले नाही आणि अत्यंत समजूतदारपणे आणि धैर्याने आपले जीवन जगले. Maza Avadta Sant Essay in Marathi

माझा आवडता संत निबंध मराठी

जेव्हा ते केवळ 15 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी स्वतःला भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये पूर्णपणे लीन केले होते आणि ते एक सिद्ध योगी बनले होते.त्या काळी सर्व ग्रंथ संस्कृतमध्ये होते

आणि सर्वसामान्यांना संस्कृत येत नव्हती, परिणामी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी ज्ञानेश्वर या विद्वान बालकाने गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी नावाचे भाष्य रचून संस्कृतची गोडी उघडली. लोकांच्या भाषेत ज्ञान. Maza Avadta Sant Essay in Marathi

हे संत नामदेवांचे समकालीन होते आणि त्यांनी त्यांच्यासोबत महाराष्ट्रभर प्रवास केला, लोकांना ज्ञान आणि भक्तीची ओळख करून दिली आणि समता, समानतेचा संदेश दिला. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी या महान संत आणि भक्त कवीने हे नश्वर जग सोडून समाधी घेतली.

अगदी लहान वयातच ज्ञानेश्वरजींना जातीतून बहिष्कृत केल्यानंतर अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. त्यांच्याकडे राहण्यासाठी योग्य झोपडीही नव्हती. संपूर्ण जगाने त्याला संन्यासीचे बाळ म्हणुन तुच्छ लेखले.

लोकांनी त्याला सर्व प्रकारचे त्रास दिले, परंतु त्याने सर्व जगावर अमृत शिंपडले. वर्षानुवर्षे हा बालक भगीरथ घोर तपश्चर्या करीत राहिला. सागरपुत्रांचा उद्धार आणि गंगेतून अस्थिकलश पडलेला तत्कालीन समाजबांधव हे त्यांचे साहित्य होते. ‘Maza Avadta Sant Essay in Marathi’

भावार्थाने दीपिकाची ज्योत प्रज्वलित केली.तो प्रकाश इतका अद्भुत आहे की तो पेटला होता. तो प्रकाश इतका अद्भुत आहे की त्याची ज्योत कोणालाही जाणवत नाही, प्रत्येकाला प्रकाश मिळतो. ज्ञानेश्वरजींच्या महान साहित्यात कोठेही कोणाविरुद्ध तक्रार नाही.

राग, राग, मत्सर, मत्सर यांचा थांगपत्ताही नाही. समग्र ज्ञानेश्वरी हे क्षमाशीलतेचे विशाल प्रवचन आहे.ज्ञानेश्वरजींची धाकटी बहीण मुक्ताबाई यांना या बाबतीत मोठा अधिकार आहे. एकदा एका खोडकराने ज्ञानेश्वरजींचा अपमान केल्याची आख्यायिका आहे.

त्याला खूप वाईट वाटले आणि तो दार बंद करून खोलीत बसला. त्यांनी दार उघडण्यास नकार दिल्यावर मुक्ताबाईंनी त्यांना केलेली विनंती मराठी साहित्यात ततीचे अभंग (दाराचा अभंग) म्हणून प्रसिद्ध आहे.

तर मित्रांना तुम्हाला माझा अवडता संत निबंध मराठी आवडलाअसेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे ” avadta sant essay in marathi” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठूम कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

संत ज्ञानेश्वरांचा जन्म कधी झाला?

संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. 1275 मध्ये आपेगाव येथे झाला.

संत ज्ञानेश्वरांनी समाधी कितव्या वर्षी घेतली?

वयाच्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली.

Leave a comment Cancel reply

You must be logged in to post a comment.

Educational मराठी

  • DISCLAIMER | अस्वीकरण
  • PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
  • प्रकल्प
  • बातमी लेखन
  • शैक्षणिक माहिती
  • अनुक्रमणिका
  • माहिती

माझा आवडता सण दिवाळी | Maza aavdata san diwali.

माझा आवडता सण दिवाळी.

🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆

               भारतामध्ये सण उत्सवांची सुवर्णमयी परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.घरा घरांमधून अंधकार दूर करून दिव्यांचा प्रकाश सर्वत्र पसरवणारी दिवाळी ही खर्च भारतातील सणांची महाराणीच आहे.

माझा महाराष्ट्र 

               ज्या वेळी श्री रामचंद्र लंकेच्या विजयानंतर ज्या वेळी ते अयोध्येला परत आले तेव्हा अयोध्यावासियांनी दिवे प्रज्वलित करून त्यांचे स्वागत केले होते. तेव्हा पासून दिवाळी या सणाची सुरुवात झाली. अजून एक मान्यता आहे ती म्हणजे महाराज युधिष्ठीर च्या राजसूय यज्ञाची पूर्णाहुती याच दिवशी झाली होती, तेव्हापासून हा हे पर्व साजरे केले जाते. अशा विविध आख्यायिका दिवाळी या सणाबाबत आहेत. काही लोक दिवाळीच्या दिवसाला भगवान महावीर यांचा निर्वाण दिन मानतात. या प्रकारे प्रत्येक भारतीय नागरिक दिवाळीच्या या प्रकाशमय पर्वात आत्मीयतेचा अनुभव करतो.

               दिवाळी सफाई आणि सजावटीचा सोनेरी संदेश घेऊन येते. दिवाळी येण्याच्या आधी काही दिवस लोक आपल्या घराची साफ सफाई करायला सुरुवात करतात. आपल्या घराचा परिसर झाडून साफ करतात. लोक दिवाळीच्या सणानिमित्त नवनवीन कपडे खरेदी करतात. स्त्रिया दिवाळीच्या मुहूर्तावर दागिने खरेदी करतात. प्रत्येक घरामध्ये गोड धोड पदार्थ बनवले जातात. या प्रकारे दिवाळी चे आगमन होण्याच्या आधीच सर्व ठिकाणी उत्साहाची आणि आनंदाची लहर उठते.

माझी आई.

               आश्विन महिन्यातील कृष्णपक्ष च्या त्रयोदयीपासून ते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीये पर्यंत ( भाऊबीज) पर्यंत दिवाळी हा सण मोठ्या धामधुमीने साजरा केला जातो. घरा - घरांमध्ये दिवे, मेणबत्त्या, तसेच विजेचे विविध प्रकारचे दिवे लावून घर प्रकशित केले जाते. फटाक्यांच्या आतीश्बाजीने सारे वातावरण आनंदून जाते. त्रयोदशी (धनत्रयोदशी) या दिवशी लोक आपल्याजवळ असलेल्या धनाची पूजा करतात. चतुर्दशी ला ‘नरक चतुर्दशी’ सुद्धा बोलले जाते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णानांनी नरकासुराचा संहार केला होता.

               अमावस्येचा दिवस हा दिवाळीचा दिवस असतो. याच दिवशी व्यापारी लोक त्यांच्याकडे असणाऱ्या हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात. दिवाळीच्या निमित्ताने सर्व नातेवाईक एकमेकांना भेटायला येतात. यानंतर येते ती म्हणजे भाऊबीज या दिवशी बहिण भावला टिळा लावते आणि गोड-धोड पदार्थ खाऊ घालते. या दिवशी भाऊ बहिणीला काही तरी भेटवस्तू देतो.

माझा आवडता ऋतू : पावसाळा

               दिवाळीच्या प्रकाशाने सर्वांचे घर-अंगण आणि तन-मन दोन्ही ही आनंदाने भरून जातात. आपल्या मनातील द्वेष भावना दूर होतात.सर्वांचे हृदय प्रेम आणि सद्भावाने भरून जाते. यामुळे सामाजिक जीवनाला एक नवीन चेतना मिळते. असा हा दिवाळीचा सण माझा प्रिय सण आहे.

  वर्णनात्मक निबंध निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?

  🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆

मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा 👇

[मुद्दे:

प्रस्तावना

दिवाळीच्या संदर्भामध्ये असणाऱ्या पौराणिक कथा

दिवाळीच्या आधीची पूर्व तयारी

दिवाळीच्या सणाचे वर्णन

दोषांचे निवारण

संदेश.]

हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता

maza aavdata san diwali nibandh dakhava maza aavadata san diwali nibandh in martahi maza aavadata san diwali essay in marathi language maza aavadata san diwali ya vishyavar nibandh maza aavadata san diwali yavar nibandh in marathi  माझा आवडता सण दिवाळी  माझा आवडता सण दिवाळी माहिती माझा आवडता सण दिवाळी वर निबंध माझा आवडता सण दिवाळी निबंध इन मराठी

  • निबंध आवडल्यास आम्हाला  COMMENT   करून नक्की सांगा.  
  • तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला   COMMENT   मध्ये किंवा   CONTACT FORM   द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.  
  • तुमच्या आवडत्या सणाचे थोडक्यात वर्णन आम्हाला COMMENT द्वारे कळवा.

धन्यवाद

Post a Comment

माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध Maza Avadta Sant Essay in Marathi

Maza Avadta Sant Essay in Marathi माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी असे खालील समर्पक दृष्टांत ज्यांनी दिले तसेच, परमात्मा, जीव आणि जगत यांच्यातील अद्वैत जाणून घेणे म्हणजे ज्ञान! असे ज्ञानाचे महत्व देणारे संत ज्ञानेश्वर महाराज खरंच किती महान होते. केवळ ज्ञानामुळे कैवल्यप्राप्ती होऊ शकते, हे खरे परंतु हा ज्ञानमार्ग पेलणारे, प्रज्ञावंत जगात सर्वत्र असू शकतील असे नाही, शिवाय परमात्मा हा केवळ बुद्धिगम्य नाही. तो अंत:करणाचाच विषय आहे. शांतरस हा ज्ञानेश्वरीचा गाभा आहे. ज्ञानदेवांच्या अलौकिक निरीक्षण शक्तीमुळे सुंदर शब्दचित्रेही ज्ञानेश्वरीत सापडतात. सारा महाराष्ट्र ज्ञानदेवांना ‘माऊली’ या नावाने ओळखतो.

” चंद्र तेथे चंद्रिका | शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका | असणे चि जी || “ रावो तेथे कटक | सौजन्य तेथे सोयरीक वन्ही तेथे दाहक | सामर्थ्य की || “

maza avadta sant essay in marathi

माझा आवडता संत निबंध मराठी – Maza Avadta Sant Essay in Marathi

माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी – sant dnyaneshwar essay in marathi.

आई, माता, जननी असे याच अर्थाचे दुसरेही काही शब्द आहेत. पण, ‘ माऊली’ शब्द वेगळाच आहे. त्यातील जिव्हाळा, आपुलकी, जवळीक अवर्णनीय आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या हृदयातून स्त्रवलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी! ‘गीता’ हे उपनिषदरुपी गाईचे दूध मानले जाते, पण तेही पचेनासे झाले होते, कारण गाईचे नाही तर आईचे दूध या महाराष्ट्राला हवे होते. या माऊलीच्या दूधाने महाराष्ट्राच्या तनमनाने बाळसे घेतले ! माऊलीने गीता तत्वज्ञान पाजले,’ ‘हल्लरू’ गाऊन महाराष्ट्राला ‘समाधी बोधे’ निजवले.

माऊलीने सगळ्यांना ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी वेदांतीची  क्लिष्ट अशी परिभाषा टाळली. अवतरणे, खंडन – मंडन, अभिनिवेश यातून तत्वज्ञान मस्तकात चढते ! पण, कधी हृदयात उतरत नाही. तत्वज्ञान हा अतिशय मधूर व जीवनस्पर्शी असा विषय आहे. याची सुस्पष्ट जाणीव माऊलींच्या तेजोत्सर्जी अशा शब्दांनी आम्हाला करून दिली.

  • नक्की वाचा: संत ज्ञानेश्वरांची संपूर्ण माहिती

अशा थोर विचारवंताचा जन्म शके ११९७ युवा संवस्तर वद्य ८ गुरुवार मध्यरात्रीला झाला. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे आपेगाव येथील कुलकर्णी होते. विठ्ठलपंत यांना संन्यास घ्यावासा वाटल्यामुळे गृहस्थाश्रम सोडून त्यांनी संन्यासधर्म स्विकारला. परंतु, पुढे आपल्या गुरुंच्या सांगण्यावरून त्यांनी गृहस्थाश्रम स्विकारला व पुढे त्यांना एकूण चार अपत्ये झाली.

विठ्ठलपंत यांनी संन्यासानंतर पुन्हा संसार केला. संन्याशाची पोरे म्हणून समाजातील लोकांनी त्यांच्या मुलांची अवहेलना केली. असा कडवट अनुभव येऊनही संत ज्ञानेश्वरांच्या अंत:करणाची शांती ढळली नाही. हे सारे त्यांनी अनुभवल्यामुळे स्त्रीशुद्रादिकांचे व बहुजन समाजाचे दुःख ज्ञानेश्वरांना समजले आणि म्हणूनच त्यांच्या सहानुभूतीचा ओघ या वर्गाकडे वळला.

ज्ञानेश्वरांच्या घराण्यात नाथपंथांची शिकवण परंपरेने आलेली होती. पंढरपूरचे विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत होते. ज्ञानेश्वरांनी नाथपंथांचा अद्वयानंद व पंढरपूरची प्रेम व भक्ती यांचा मनोहर संगम घडवून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची सुरेख सुरुवात केली.

” देवाचिया द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या || हरिमुखे म्हणा , हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ||”

यासारख्या अभंगातून परमार्थ अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात संत ज्ञानेश्वरांनी विशद केला आहे. हरीच्या सगुण – निर्गुण रूपाचे वर्णन त्यांच्या  अनेक अभंगात कलात्मक सौंदर्याने नटवून दर्शवले आहे. तसेच, त्यांचे अभंग प्रपंच आणि परमार्थाचा देखील सुंदर समन्वय घडवितात.

” चांगदेवा तुझेनि व्याजे | माऊलिया श्री निवृत्तीरागे || स्नानुभाव रसाळ पाजे | दिधले लोभें || “

असे विनयपूर्ण उदगार काढून आपल्या लेखनाचे सारे श्रेय ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथ व चांगदेव यांना दिले आहे.

ज्ञानेश्वरांनी गीतेच्या ७०० श्लोकांचा, ज्ञानेश्वरीतील ९००० ओव्याईतका स्वतंत्र विस्तार केलेला पाहिल्यावर आपल्याला त्यांच्या प्रतिभेची झेप लक्षात येते. ‘यथार्थदीपिकाकार’ वामनाप्रमाणे, पांडित्याचा कोणताच अभिनिवेश ज्ञानेश्वरांनी आणलेला नाही. सर्वसामान्याला भक्तिमार्ग आचरता यावा म्हणून त्यांनी देशी भाषेत ग्रंथरचना केली व गीतेतील तत्वज्ञान सुबोध व्हावे म्हणून ज्ञानेश्वरीची रचना केली.

” ज्ञानदेवे रचिला पाया , उभारिले देवालया || “

भागवत धर्म मंदिराचा हा पाया रचताना ज्ञानेश्वरांचे विशेष वैशिष्टय दिसून येते, ते म्हणजे वर्णाश्रम धर्माच्या रुढ अशा कल्पनेला धक्का न लावता त्यांनी समता प्राप्त केली.

” म्हणोनी कुळजाती वर्ण | हे अवघेचि गा अप्रमाण ||”

असे त्यांनी कळवळ्याने सांगितले. त्यांच्या रचनेत हरिपाठ, चांगदेव पासष्टी, नमन आणि अभंग इत्यादी गणना होते. ‘ अमृतानुभव ‘ सारखा, ‘ जग असकी वस्तुप्रभा ‘ असा, अत्युच्य सिद्धानुवाद सांगणारा ग्रंथ ज्ञानेश्वरांच्या परिणतप्रज्ञ बुद्धीचा विलासच होय.

आयुष्याच्या अखेरीस ज्ञानदेवांना तिर्थाटनाची इच्छा झाली होती. त्यावेळी सर्वजण प्रथम पंढरपूरला गेले. तेथे भक्त नामदेवाला त्यांनी बरोबर घेतले. नामदेव हा थोर ज्ञानी भक्त होता. ज्ञानदेवांचे ज्ञान आणि नामदेवांची भक्ती यांचा सुरेख संगम झाला होता. एकाने आपले योग सामर्थ्य प्रकट केले तर, दुसऱ्याने भक्तिसामर्थ्य ! त्यांच्यासोबत चाखोबा, आरणभेंडीचे सावतामाळी , नरहरी सोनार , परीसा भागवत आणि विसोबा खेचर ही थोर संत मंडळी समाविष्ट होती.

आळंदीस आल्यानंतर ज्ञानदेवांच्या मनात आपण समाधी घ्यावी असा विचार दृढ झाला. त्यांनी गुरु निवृत्तीनाथांच्या चरणावर लोटांगण घातले आणि समाधीची अनुज्ञा मागितली. निवृत्तीनाथांना त्यांच्या मनाची अवस्था ज्ञात झाली होती. ते उन्मनी अवस्थेत होते. सोपानदेव, मुक्ताबाई यांनी ज्ञानदेवांचे चरण धरले, लगेच निवृत्तीनाथांची उन्मनी अवस्था दूर झाली, “बालपणी आईबाप सोडून गेले तेंव्हा झाले नव्हते, इतके दुःख आज मला यावेळी होत आहे.” असे निवृत्तिनाथ म्हणाले .

इंद्रायणीच्या तीरावर सिद्धेश्वराचे पुरातन स्थान आहे. तेथे सिद्धेश्वराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाच्या छायेखाली समाधिस्थान सिद्ध केले. शके १२१२ कार्तिक वद्य एकादशीला सर्वांनी हरि जागर केला. नामदेवांनी भरल्या अंत:करणाने हरिकीर्तन केले. द्वादशीला पारणे सोडले. समाधिस्थानाची शिळा तयार होती. ज्ञानदेव समाधीकडे जाण्यास उठले. सगळ्यांनी त्यांना वंदन केले.

भगवंतांनी ज्ञानदेवांच्या कपाळी केशरी गंध लावून गळ्यात पुष्पहार घातला. सर्व संतमंडळी शोकाकूल झाली होती. आर्त स्वरात भजन चालले होते. नामघोषाने दशदिशा भरुन टाकल्या होत्या. निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांनी शेवटी परत एकदा साष्टांग प्रणिपात केला. भावंडांनी ज्ञानदेवांचे अखेरचे दर्शन साश्रूनयनांनी घेतले. शेवटी, निवृत्तिनाथांनी ज्ञानदेवांना एका हाताने धरले आणि समाधिस्थानातील आसनावर नेऊन बसविले, अखेर ज्ञानदेवांनी डोळे मिटले.

वास्तववादी धर्मसुधारक, क्रांतदर्शी, तत्वज्ञ, अनुभूतिवादी संत आणि प्रतिभासंपन्न कवी, भागवत धर्माचे प्रवक्ते असे महान आणि माझे आवडते संत ज्ञानेश्वर महाराज , महाराष्ट्र संस्कृतीच्या ज्ञानाचे चालते बोलते बिंब, कैवल्याचा पुतळा, कार्तिक वैद्य १३ शके १२१८ ला समाधिस्थ झाले .

आज जरी ते आपल्यासोबत नसले, तरी त्यांचे विचार, त्यांचे ज्ञान आजही अजरामर आहे.

” रुप पाहता लोचनी | सुख झाले हो साजणी . तो हा विठ्ठल बरवा | तो हा माधव बरवा . बहुता सकृतांची जोडी | म्हणुनी विठ्ठली आवडी सर्व सुखांचे आगरु | बाप रखुमादेवी वरु || “

            – तेजल तानाजी पाटील

              बागीलगे , चंदगड.

आम्ही दिलेल्या maza avadta sant essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maza avadta sant nibandh in marathi   या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि majha avadta sant essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण maza avadta sant in marathi essay या लेखाचा वापर sant dnyaneshwar essay in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

maza avadta san essay in marathi holi

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

माझा आवडता सण दिवाळी वर निबंध | Maza Avadta San Diwali Nibandh

Maza Avadta San Diwali Nibandh: सण हे आपल्या जीवनाचा एक भाग आहेत. आपल्या जीवनात आनंद आणतो. सण साजरे करण्यामागे एक इतिहास आणि स्वतःचे महत्त्व आहे.

माझा आवडता सण दिवाळी वर निबंध – Maza Avadta San Diwali Nibandh

Table of Contents

माझा आवडता सण दिवाळी वर निबंध-Maza Avadta San Diwali Nibandh

माझा आवडता सण दिवाळी लहान निबंध – Short Essay on My Favourite Festival Diwali in Marathi

दिवाळीचा सण मोठा आनंदाला नाही तोटा असे आपण नेहमीच म्हणत असतो. दिवाळीचा सण म्हणजे लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच आनंदाची पर्वणी असतो. हा सण प्राचीन काळापासून आपल्या भारतात साजरा करतात. आज कित्येक परकीय लोकही दिवाळी साजरी करतात.

दिवाळीच्या या सणाला ऐतिहासिक परंपरा आहे. प्रभूरामचंद्रांनी विजयादशमी दिवशी रावणाचा वध केला आणि सीतेसह पुष्पक विमानातून अयोध्येला परतले. प्रजेने सगळीकडे दीप उजळले. तो हाच दिवस. आजही दिवाळीदिवशी लोक दीप लावतात. आकाश कंदील लावतात. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सारेच आनंदात सामील होतात. फटाके, फुलबाजे लावून आपला आनंद व्यक्त करतात.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यादिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. सगळेजण अभ्यंगस्नान करुन मनोभावे लक्ष्मीची पूजा करतात. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, तो हाच दिवस. आश्विन शुद्ध चतुर्दशीला नरकचतुर्दशी साजरी करतात. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येदिवशी व्यापारी लोक मोठ्या थाटामाटाने लक्ष्मीपूजन करतात.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा धर्मनिष्ठ व उदार बळीराजाने या दिवशी यज्ञ करून प्रतिकारशक्ती मिळवली होती. भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. भाऊ आपल्या कुवतीप्रमाणे बहिणीला आहेर करतो. काहीतरी भेट देतो. दिवाळीचा फराळ तर पहिल्या दिवसापासून चालूच असतो.

हे पण वाचा – दिवाळी सणाची माहिती मराठीत

Maza Avadta San Diwali Yavar Nibandh – माझा आवडता सण दिवाळी या विषयावर निबंध मराठी (लहान निबंध)

HAPPY DIWALI WALLPAPER

दिवाळी हा एक भारतीय हिंदू सण आहे जो दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, हा सण कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी येतो. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा हा एक शुभ सण आहे. हा दिव्यांचा सण आहे.

दिवाळीच्या काही दिवस आधी फटाके आणि मिठाईने उत्सव सुरू होतो. प्रत्येक घरात सर्वत्र दिवे दिसू लागतात. प्रत्येक घरात दिवे आणि फटाके ठेवले जातात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सणाचा आनंद घेतात. भगवान रामाने मारलेल्या दुष्ट मनुष्य रावणाच्या मृत्यूचे प्रतीक दिवाळी. हा दिवस असा मानला जातो की जेव्हा चांगले वाईटावर यशस्वी होते.

मला दिवाळीचा सण आवडतो कारण दिवस दिव्यांनी भरलेला असतो आणि मला फटाके आणि दिवे लावायला आवडतात. सकाळी लवकर आंघोळ करून नवीन कपडे घालतो. या दिवशी घरी खूप मिठाई आणि स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. सर्व दुकाने आणि बाजारपेठा रोषणाईने सजल्या जातात. प्रत्येकजण आपापल्या घरी मेणबत्त्या आणि दिवे लावतात.

लोक या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि चांगली संपत्ती, समृद्धी आणि भाग्यासाठी प्रार्थना करतात. दिवाळी हा काही एका दिवसाचा उत्सव नाही. उत्सवाची तयारी महिनाभर आधीपासून सुरू होते. सौभाग्य आणि संपत्ती प्रदान करण्यासाठी देवी लक्ष्मीला आमच्या घरी भेट देण्यासाठी आम्ही आमची घरे स्वच्छ करतो. आम्ही मिठाई, हलके दिवे आणि फटाके देखील तयार करतो. प्रत्येकाला दिवाळी साजरी करायला आवडते कारण यामुळे मनाला आनंद मिळतो आणि नाती अधिक जवळ येतात.

हे पण वाचा – दिवाळी निबंध मराठी 10 ओळी

Maza Avadta San Diwali Marathi Madhe – माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठीत (संक्षिप्त निबंध)

भारत हा अनेक सण साजरे करणारा देश आहे. हिंदू सणांपैकी दिवाळी किंवा दीपावली हा हिंदूंसाठी सर्वात मोठा सण आहे. हा प्रकाशाचा सण आहे. आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा सन्मान करणारा हा सण आहे. हा शुभ दिवस संपूर्ण भारतात आनंदाने आणि दिव्यांनी साजरा केला जातो. हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो आणि हिंदू कॅलेंडरनुसार तो कार्तिक महिन्यात अमावस्येच्या दिवशी येतो.

दुष्ट रावणावर, १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परतल्यावर, भगवान रामाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. हा सण वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे. रावणावर रामाचा विजय देशभरात आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. दिवे लावणे आणि फटाके पेटवणे हे घरातील समृद्धीचे प्रतीक आहे. लोकसाहित्य परंपरेनुसार, भगवान रामाचे स्वतःच्या भूमीत स्वागत करण्यासाठी घरांमध्ये दिवे लावले गेले. या दिवसाच्या स्मरणार्थ, त्या दिवशी सर्व काही दिव्यांनी सजवले जाते. हे एक समृद्ध उत्सव स्वरूप देते.

दिवाळी हा माझा आवडता सण आहे कारण या दिवशी संपूर्ण भारत दिव्यांनी झाकलेला असतो आणि आपण फटाके पेटवून, मिठाई खाऊन आणि नवीन कपडे घालून खूप आनंद घेतो. दिवसाच्या एक आठवडा आधी उत्सव सुरू होतो आणि लोक मिठाई तयार करण्यास आणि उत्सवासाठी सजवण्यासाठी त्यांची घरे स्वच्छ करण्यास सुरवात करतात. या दिवशी देवीच्या स्वागतासाठी आपण आपल्या घरासमोर रंगीबेरंगी रांगोळ्या काढतो. असे मानले जाते की देवी लक्ष्मी या दिवशी प्रत्येक घरात भाग्य, संपत्ती आणि समृद्धी आणते.

मला दिवाळी साजरी करायला आवडते कारण आम्ही फटाके खरेदी करतो आणि रात्री ते जाळतो आणि आमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत आनंद घेतो. आम्ही खूप गोड पदार्थ खातो आणि वाटप करतो आणि चविष्ट अन्न देतो आणि एकमेकांना भेटवस्तूंची देवाणघेवाण करतो. या दिवशी, आकाश पाहणे हे एक सौंदर्य आहे. फटाक्यांसोबत ते छान दिसेल. अशा प्रकारे, दिव्यांचा दिवस, दिवाळी हा माझा आवडता सण आहे कारण तो चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे.

हे पण वाचा – दिवाळी निबंध मराठी

माझा आवडता सण दिवाळी वर परिच्छेद – Paragraph on Diwali in Marathi

दिवाळी हा माझा आवडता सण आहे. हा दिव्यांचा सण आहे, तो आपल्या देशाच्या सर्व भागात साजरा केला जातो. दिवाळीच्या काही दिवस आधी लोक आपली घरे आणि दुकाने स्वच्छ करून घेतात. दिवाळीच्या दिवशी लोक आपली घरे सजवतात. दिवाळीच्या रात्री प्रत्येक गावात, शहरात दिवे लावले जातात. सर्व घरे, दुकाने आणि इमारती मातीचे दिवे, मेणबत्त्या आणि इलेक्ट्रिक बल्बने प्रकाशित होतात. मुले त्यांच्या चांगल्या कपड्यांमध्ये फिरतात. लोक मिठाई आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. मुले मिठाई, खेळणी आणि फटाके खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करतात. रात्री लोक धनाची देवी लक्ष्मीची पूजा करतात. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. या दिवशी प्रत्येकजण आनंदी असतो.

My Favourite Festival Diwali Essay in Marathi – माझा आवडता सण दिवाळी निबंध इन मराठी

माझी आवडती सुट्टी म्हणजे दिवाळी किंवा दीपावली. त्याला “दिव्यांचा उत्सव” असेही म्हणतात. भारतातील हिंदू आणि भारतीय ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हा सण साजरा करतात. त्याची उत्पत्ती २,५०० वर्षांपूर्वी झाली.

या उत्सवाशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. रामायण, एक प्राचीन महाकाव्यानुसार, राम चौदा वर्षांच्या वनवासानंतर आपल्या राज्यात परत आला आणि दुष्ट राक्षस रावणाचा पराभव केला, ज्याने त्याची पत्नी सीतेचे अपहरण केले. त्यांचे राज्य अयोध्येला आल्यावर लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले. दक्षिण भारतातील एक लोकप्रिय कथा हिंदू देव कृष्णाविषयी आहे, ज्याने सोळा-हजार स्त्रियांना नरकासुर या दुष्ट राजापासून वाचवले होते. दोन्ही कथांमध्ये वाईटावर चांगल्याचा विजय आहे. दिवाळी हा देवी लक्ष्मीचाही उत्सव आहे.

दिवाळीच्या दिवशी मला मंदिरात जायला आवडते, जिथे मी लक्ष्मीची प्रार्थना करतो. आपण शांती, समृद्धी आणि संपत्तीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करतो. मी नवीन भारतीय कपडे देखील घालतो, जसे की पुरुषांसाठी कुर्ता आणि महिलांसाठी साडी.

आम्ही आमच्या घरी मातीपासून बनवलेल्या दिवे तेलाने पेटवतो. तूप किंवा तेलात बुडवलेली कापसाची वात वापरून आम्ही त्यांना प्रकाश देतो. दिवाळीला “दिव्यांचा सण” असे संबोधण्याचे हे एक कारण आहे. हे वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधार दूर करण्याचे सूचित करते. आम्ही आमच्या मित्र आणि कुटुंबासह मिठाई देखील वाटून खातो.

दुधाच्या अनेक स्वादिष्ट मिठाई, काजू मिठाई आणि बदामाची मिठाई माझे कुटुंब तयार करते, परंतु या सर्व स्वादिष्ट मिठाईंपैकी गुलाब जामुन हे माझे आवडते आहे. हे साखरेच्या पाकात भिजवलेले खूप गोड असतात.

माझ्यासाठी दिवाळीचा माझा सर्वात आवडता भाग म्हणजे माझ्या कुटुंबासह रोषणाई करणे. चमचमीत प्रकाश आणि माझ्या कुटुंबाला “हॅपी दीपावली” म्हणणे मला दिवाळीचा खरा आत्मा शोधण्यात मदत करते, म्हणजे एकत्रता.

भारतात अनेक सण साजरे होतात, पण माझा आवडता दिवाळी आहे. दिवाळी आपल्याला नवीन सुरुवातीची आशा देते. दिवाळी आपल्या सर्वांना आनंद आणि आनंदाच्या भावनेने एकत्र आणते.

माझा आवडता सण दिवाळी मोठा निबंध – My Favourite Festival Diwali in Marathi

दिवाळी सण हा माझ्या आवडत्या सणांपैकी एक आहे. दरवर्षी मी दिवाळीच्या सणाची आतुरतेने वाट पाहतो. दिवाळीचे ४-५ दिवस खूप आनंददायी आणि मनोरंजक असतात. हा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो आणि हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे.

दिवाळीची तयारी

दिवाळी जवळ आली की घरे, दुकाने स्वच्छ करून रंगरंगोटी केली जाते. खोल्या पूर्णपणे स्वच्छ आणि सजवल्या जातात, कारण अशी जुनी समजूत आहे की या दिवशी देवी लक्ष्मी घरात येते आणि तिच्या आशीर्वादाचा वर्षाव करते. या दिवशी आपण सर्व मातीचे दिवे मोहरीच्या तेलाने लावतो. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. या दिवसात बाजारपेठा नवनवीन वस्तूंनी भरलेल्या असतात आणि या दिवसात बाजारपेठांमध्ये खूप गर्दी असते. लोक त्यांच्या आवडीच्या वस्तू विकत घेतात आणि तीच मुलं स्वतःसाठी फटाके आणि नवीन कपडे घेतात आणि मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात.

दिवाळीचा सण

धनत्रयोदशीचा सण दिवाळीच्या एक दिवस आधी येतो. धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारपेठांमध्ये गर्दी असते. लोक भांडी, सोने, चांदी आदींची खरेदी करतात. दिवाळीच्या दिवशी आपण आपल्या घराच्या दारात रांगोळी काढतो आणि फुलांच्या हारांनी घर सजवतो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात आणि संध्याकाळी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करतात. देवी लक्ष्मी आपल्या घरी यावी म्हणून घराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवल्या जातात. नंतर, प्रसाद घेतल्यानंतर, आम्ही टेरेस आणि खोल्यांमध्ये दिवे लावतो. सर्वत्र दिवे लावल्यानंतर, आम्ही गच्चीवर जातो आणि फटाके फोडण्याचा आनंद घेतो.

मला हा सण खूप आवडतो कारण या उत्सवात एक साधेपणा आहे. जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र प्रार्थना करते तेव्हा मला ते आवडते. प्रसाद म्हणून लाडू खायला मिळतात. आजूबाजूला फक्त प्रकाश आहे जो अतिशय आकर्षक आहे.

दिवाळीनिमित्त माझ्या शाळेत रांगोळी स्पर्धा

दिवाळीच्या निमित्ताने रांगोळी काढण्याची प्रथा सर्रास सुरू आहे. दिवाळीच्या सुट्टीपूर्वी माझ्या शाळेत रांगोळी काढण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. रांगोळी काढण्याची आवड असलेले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात आणि रांगोळी काढून आपली कला प्रदर्शित करतात. रांगोळी स्पर्धा एकट्याने किंवा गटात आयोजित केली जाते. या स्पर्धेसाठी विद्यार्थी खूप उत्सुक असतात आणि विद्यार्थी फुले, रंग, तांदूळ, पीठ इत्यादींच्या मदतीने आपली कला दाखवतात. विद्यार्थी आपल्या कौशल्याने विविध प्रकारच्या रंगीबेरंगी रांगोळ्या काढतात. सर्वोत्तम रांगोळी काढणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस दिले जाते.

या सणाबद्दल आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो आणि आपल्यातील कलागुणांना बाहेर काढण्याची संधी मिळण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. या स्पर्धेनंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटपही करतो.

सण साजरे करण्यामागे धार्मिक श्रद्धा आहे

दिवाळीचा सण साजरा करण्यामागे अनेक धार्मिक कथा आहेत. भारत हा विविध सांस्कृतिक आणि धार्मिक श्रद्धांचा देश आहे, त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करण्यामागे अनेक धार्मिक श्रद्धा आहेत. या सर्व विश्वासांपैकी सर्वात लोकप्रिय श्रद्धा म्हणजे भगवान श्री राम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले. वनवासात रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला लंकेत नेले आणि भगवान रामाने रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले आणि त्याच दिवशी अयोध्येला परतले. राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतल्याच्या स्मरणार्थ लोक या दिवशी मोठ्या आनंदाने अयोध्याला सजवतात. अयोध्या नगरीत लोकांनी अत्यंत उदार मनाने रामाचे स्वागत केले होते.

जर आपण या सणाच्या सर्व समजुतींवर नजर टाकली तर आपण असे म्हणू शकतो की हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. दिव्यांचा सण हा आनंदाचा आणि अंधार आणि वाईटावर विजय मिळवण्याचा सण आहे. सदैव सत्य आणि चांगुलपणाचा मार्ग अवलंबला पाहिजे असा संदेशही हा सण देतो.

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यावर भर

आपण दरवर्षी दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो. या दिवशी अनेकजण फटाकेही पेटवतात. फटाक्यांमधून भरपूर धूर निघतो, त्यामुळे आपले वातावरण खूप प्रदूषित होते. फटाक्यांच्या धुरात अनेक हानिकारक पदार्थ असतात. यामुळे आपला एअर क्वालिटी इंडेक्स (AIQ) खालावतो, ज्यामुळे आपल्या आरोग्याला खूप नुकसान होते. फटाक्यांच्या या धुरामुळे आपले वातावरणही अत्यंत विषारी बनते, त्यामुळे पशु-पक्ष्यांचे खूप नुकसान होते. फटाक्यांमुळे होणाऱ्या आवाजाचा आपल्या मुलांवर, वृद्धांवर आणि प्राण्यांवर खोलवर परिणाम होतो.

दिवाळीच्या या सणावर सर्व दुकाने, घरे, मंदिरे आणि आजूबाजूची सर्व ठिकाणे दिव्यांनी उजळून निघतात, ज्यामुळे खूप सुंदर दृश्य दिसते. देश-विदेशातील सर्व धर्माचे लोक हिंदूंचा हा प्रमुख सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनही हा सण साजरा केला जातो.

  • दिवाळी सणाची माहिती मराठीत
  • दिवाळी निबंध मराठी
  • दिवाळी निबंध मराठी 10 ओळी
  • माझे आजोबा निबंध मराठी
  • माझी आजी निबंध मराठी 
  • माझे बाबा निबंध मराठी
  • मी पाहिलेला अपघात निबंध
  • माझी शाळा मराठी निबंध
  • माझा आवडता खेळ निबंध
  • माझा जिवलग मित्र मराठी निबंध 
  • माझे कुटुंब निबंध मराठी
  • शिक्षक दिन निबंध मराठी 
  • माझी शाळा निबंध मराठी लेखन
  • माझी आई निबंध मराठी
  • माझी शाळा निबंध 10 ओळी  

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | bhartiy samajat striyanche sthan marathi nibandh, मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | marathi shahityatil suvarn kan nibandh, मना घडवी संस्कार मराठी निबंध, “मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”, भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | bhartatil vansanpatti essay marathi, भारतीय लोकशाही मराठी निबंध | bhartiya lokshahi marathi nibandh, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध। maza avadta san essay in marathi

माझा आवडता सण दिवाळी माहिती। maza avadta san diwali nibandh marathi.

maza avadta san essay in marathi:   दिवाळी हा सण आपल्या देशात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणामध्ये सर्वात मोठा सण आहे. दिवाळी पूर्ण भारतात भव्यपणे साजरी केली जाते. दिवाळी फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर असलेले भारतीय व इतर देशातील विदेशी लोक सुद्धा अतिशय भव्य पणे साजरी करतात. 

आजच्या या आर्टिकल मध्ये तुम्हाला दिवाळी निबंध मराठी, दिवाळी सणाची माहिती,  Diwali Marathi essay,  maza avadta san diwali    इत्यादी विषयांची माहिती मिळणार आहे. 

माझा आवडता सण | M aza Avadta San Essay in Marathi  (400 शब्द)

दिवाळीचा सण प्रत्येकासाठी आनंद घेऊन येतो, मग तो व्यक्ती लहान असो किंवा मोठा. प्रत्येक जण या सणाला अतिशय भव्य पणे साजरा करतात. सोबतच शाळा-कॉलेज आणि कार्यालयांमध्ये सुद्धा दिवाळी अतिशय आनंदाने साजरी केली जाते. हा सण वर्षातून एकदाच ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. दिवाळी येताच लोक आपल्या घराची साफसफाई करायला लागतात. नवीन कपडे खरेदी करतात, मिठाई खातात, दिवाळीच्या दिवशी दिवे लावले जातात, देवी लक्ष्मी व गणपतीची पूजा केली जाते.

दिवाळी या सणाची हिंदू धर्माचे लोक खूप आतुरतेने वाट पाहतात. हा सण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडता सण आहे. दिवाळी हा भारताचा सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध सण आहे. ज्याला पूर्ण देशात प्रत्येक वर्षी साजरे केले जाते. रावणाला पराजित केल्यानंतर, 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून भगवान राम आपले राज्य अयोध्येला परत आले होते. त्यादिवशी अयोध्येतील लोकांनी दिवाळी साजरी करून त्यांचे स्वागत केले होते. 

आज सुद्धा लोक या दिवसाला त्याच उत्साहाने साजरा करतात. दिवाळी हा दिवस एक पवित्र हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. शीख धर्माच्या लोकांद्वारे हा सण त्यांचे सहावे गुरू श्री हरगोविंदजी यांची जहांगीर बादशहाच्या कैद मधून सुटका झाल्याच्या आनंदात साजरा केला जातो.

या दिवशी बाजाराला नववधू सारखे सजवले जाते. अनेक प्रकारचे लाईट, कंदील, फटाके, घर सजावटीचे साहित्य, मिठाई, मेणबत्या, गिफ्ट इत्यादी गोष्टींना विशेष प्रमाणात विकले जाते. बाजारात पण या सणादरम्यान विशेष गर्दी असते. लोक आपल्या घराला स्वच्छ करतात. आणि उत्सव येण्याच्या काही दिवस आधी रंगबिरंगी उजेडाने सजवतात. 

हिंदु कॅलेंडर नुसार सूर्यास्त नंतर लोक देवी लक्ष्मी आणि गणेश भगवान ची पूजा करतात. ते आशीर्वाद, आरोग्य, धन आणि उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. गोड मिठाई बनवल्या जातात. लोक या दिवशी चांगले संकल्प करतात व वाईट सवयींना त्यागतात.

दिवाळी चा पहिला दिवस धनत्रयोदशी चा असतो. या दिवशी भगवान धन्वंतरी ची पूजा केली जाते. लोक सोन्याची खरेदी देखील करतात. देवी लक्ष्मी ची पूजा व आराधना केली जाते. दिवाळी चा दुसरा दिवस नरक चतुर्दशी असतो. या दिवसाला भगवान कृष्ण ची पूजा केली जाते. भगवान कृष्ण ने याच दिवशी नरकासूर राक्षसाचा वध केला होता. 

तिसरा दिवस दिवाळी चा मुख्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला संध्याकाळी नातेवाईक, मित्र, शेजारी व जळणाऱ्या फटाक्या सोबत मिठाई आणि भेट वस्तू देत देवी लक्ष्मी ची पूजा करत साजरे केले जाते. चौथ्या दिवशी भगवान कृष्ण ची पूजा करून गोवर्धन पूजेचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या दरवाजाच्या बाहेर पूजा करून शेनापासून गोवर्धन पर्वत बनवतात. पाचवा दिवस भाऊबीजचा असतो. या दिवसाला भाऊ बहीण साजरा करतात. बहिण आपल्या भावाला आरती ओवाळते व भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेट वस्तु देतो. 

आशा पद्धतीने अतिशय आनंदात, संपूर्ण कुटुंबासोंबत दिवाळी चा हा सण साजरा केला जातो. दिवाळी च्या काळात शाळा कॉलेज ला काही दिवसांच्या सुट्ट्या मिळाल्या असतात. ज्यामुळे दिवाळी सणाचा आंनद आणखीनच वाढून जातो. आणि म्हणूनच इत्यादि अनेक कारणांमुळे माझा आवडत सण दिवाळी आहे.

तर मित्रानो हा होता माझा आवडता सण दिवाळी ( maza avadta san diwali  ) यावर लिहिलेला मराठी निबंध. तुम्हाला हि दिवाळी मराठी माहिती (diwali marathi mahiti) कशी वाटली आम्हाला कंमेंटस मध्ये नक्की सांगा.

माझा आवडता सण दिवाळी विडिओ पहा-

  • माझा आवडता सण होळी
  • गुढी पाडव्याची माहिती

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Learning Marathi

माझा आवडता संत निबंध मराठी । Maza Avadta Sant Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन पोस्टमध्ये आपले स्वागत आहे. या पोस्ट Maza Avadta Sant Essay In Marathi मध्ये आम्ही माझा अवडता संत हा निबंध प्रदान केला आहे. कृपया पोस्ट पूर्ण वाचा.

Table of Contents

माझा आवडता संत निबंध मराठी । Maza Avadta Sant Essay In Marathi (250 शब्दात)

संत ज्ञानेश्वर हे तेराव्या शतकातील अलौकिक तेज आणि इतर ऐहिक व्यक्तिमत्त्व असलेल्या महान ऋषींपैकी एक होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन १२७५ मध्ये आपेगाव (जि. औरंगाबाद) येथे माता रुक्मिणीबाईंच्या घरी झाला.

ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत सन्यास घेऊन गृहस्थाश्रमात परतले होते. गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावर त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी चार मुले झाली. तत्कालीन समाजाने विठ्ठलपंत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा छळ केला. संन्याशांची मुले म्हणून त्यांना समाजाने दूर ठेवले. संत ज्ञानेश्वरांनी निंदेची पर्वा न करता लहानपणापासूनच आध्यात्मिक प्रगती केली.

संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे अवतार होते. संत ज्ञानेश्वर हे विठ्ठलाचे भक्त होते. वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी मराठीतील सर्वोत्कृष्ट ज्ञानेश्वरी ग्रंथ रचला. ज्ञानेश्वरीला भावार्थदीपिका असेही म्हणतात. ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेचे ज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्राकृत भाषेत पोहोचवले. ज्ञानेश्वरी सर्व स्तरातील लोकांना आकर्षित करते. ज्ञानेश्वरीतील जवळपास 9000 कवितांमध्ये असलेला भक्तीचा ओलावा अतुलनीय आहे.

अनुभव अमृतानुभव हा ज्ञानसूर्य संत ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ स्वलिखित ग्रंथ आहे. त्यातील 800 बीजांड त्याच्या तेजाची खोली व्यक्त करतात. संत ज्ञानेश्वरांनी असे समृद्ध आणि अनुभवी अभंग हरिपाठ रचून मराठीचा गौरव केला. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हे सर्वोत्तम ईश्वरस्मरणाचे नाव आहे.

ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात ज्ञानदेवांनी जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना लिहिली आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या कोणत्याही सृष्टीत समाजाने आपल्या कुटुंबावर केलेले अत्याचार जाणवलेले नाहीत. अशा महापुरुषांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आळंदीतील इंद्रायणी नदीच्या काठी संजीवनी समाधी घेतली. तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरांचे कार्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते.

संत ज्ञानेश्वरांच्या नावाने शैक्षणिक संस्था, शाळा, आश्रमशाळा स्थापन झाल्या आहेत. प्रभात कंपनीने संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर चित्रपट बनवून ज्ञानेश्वरांचे कार्य जगभर पोहोचवले. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचे महान संत होते आणि त्यांचे महत्त्व वर्णन करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत.

माझा आवडता संत निबंध । Maza Avadta Sant Essay In Marathi (500 शब्दात)

संत ज्ञानेश्वरांचा जन्म महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठी आपेगाव येथे भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला इसवी सन १२७५ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई. त्यांचे वडील उच्च श्रेणीतील मुमुक्षू आणि भगवान विठ्ठलनाथांचे निस्सीम उपासक होते.

लग्नानंतर त्यांनी संन्यास दीक्षा घेतली होती, पण गुरुदेवांच्या आदेशाने त्यांना पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करावा लागला. या अवस्थेत त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि सोपान असे तीन पुत्र व मुक्ताबाई नावाची मुलगी झाली. संन्यास-दीक्षा घेतल्यानंतर या मुलांचा जन्म झाल्यामुळे त्यांना सतत ‘संन्यासी पुत्र’ असा अपमानास्पद संबोधन सहन करावे लागले. त्यावेळच्या समाजाने दिलेल्या आदेशानुसार विठ्ठलपंतांनाही देह त्याग करावा लागला.

वडिलांच्या संरक्षणापासून वंचित असलेले अनाथ बंधू-भगिनी जनपंथाचा फटका सहन करून त्या काळातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ पैठण येथे ‘शुद्धीपत्र’ घेण्यासाठी गेले. आख्यायिका प्रसिद्ध आहे: ज्ञानदेवांनी येथे एका म्हशीच्या तोंडातून वेदांचे पठण केले होते जे ब्राह्मणांची खिल्ली उडवत होते.

गीताप्रेस, गोरखपूर यांनी प्रकाशित केलेल्या त्यांच्या चरित्रानुसार – “….. १४०० वर्षांचे तपस्वी चांगदेव यांच्या स्वागतासाठी जायचे होते, त्यावेळी ते भिंतीवर बसले होते, तीच भिंत त्या साधूकडे घेऊन गेली.” ही घटना मराठी गाण्यांमध्ये असे गायले आहे – “चालविली जाड वद्रे. हरवली चंग्याची भारती.” त्यांच्या अलौकिक चमत्काराने प्रभावित होऊन पैठण (पैठण) येथील नामवंत विद्वानांनी शक संवत १२०९ (इ.स. १२८७) मध्ये त्या चार भावंडांना ‘शुध्दिपत्र’ प्रदान केले.

तो शुद्धीपत्र घेऊन चौघेही प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या नेवासे गावात पोहोचले. ज्ञानदेवांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांना नाथ संप्रदायातील गहनीनाथांकडून शिक्षण मिळाले होते. तो आध्यात्मिक वारसा त्यांनी आपली धाकटी बहीण मुक्ताबाई यांच्याकडे ज्ञानदेवांच्या माध्यमातून सुपूर्द केला. अशाप्रकारे, उत्कृष्टतेच्या मार्गाने, सामाजिकदृष्ट्या सद्गुण असलेल्या ज्ञानदेवांनी तरुण आणि वृद्धांना अध्यात्माची साधी ओळख करून देण्याच्या उद्देशाने मराठीत श्रीमद्भगवद्गीतेवर भाष्य केले.

तिचे नाव भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी आहे. या ग्रंथाची पूर्णता शक संवत १२१२ मध्ये नेवासे गावातील महलया देवीच्या मंदिरात झाली. काही अभ्यासकांचे मत आहे की त्यांनी योगवसिष्ठावरील अभंग-वृत्तावर मराठी भाष्यही लिहिले आहे, परंतु दुर्दैवाने ते अगम्य आहे.

त्या काळातील जवळपास सर्व धर्मग्रंथ संस्कृत भाषेत होते आणि सर्वसामान्यांना फारशी संस्कृत येत नव्हती, त्यामुळे वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी, ज्ञानेश्वर या हुशार बालकाने मराठी लोकांना गीतेची जाणीव करून दिली. मराठीच्या बोलल्या जाणाऱ्या भाषेत ‘ज्ञानेश्वरी’ नावाचे गीता-भाष्य.त्यांच्याच भाषेत उपदेश करून ज्ञानाची झोळी उघडल्यासारखे होते. भाष्यकारानेच लिहिले आहे- “आता मी गीता मराठी भाषेत नीट समजावून सांगितली, तर यात आश्‍चर्याचे कारण काय… गुरूंच्या कृपेने काही शक्य आहे का?”

हा ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी ‘अमृतानुभव’ नावाचा दुसरा ग्रंथ तयार केला, ज्यात त्यांच्या राजकीय तत्त्वांची स्वतंत्र चर्चा केली आहे. हे पुस्तक पूर्ण झाल्यावर हे चार भाऊ-बहीण पुण्याजवळील आळंदी गावात पोहोचले. येथून त्यांनी योगीराज चांगदेव यांना ६५ ओव्यांमध्ये (श्लोक) लिहिलेले पत्र महाराष्ट्रात ‘चांगदेव पासष्टी’ म्हणून प्रसिद्ध आहे.

ज्ञानदेव जेव्हा तीर्थयात्रेसाठी आळंदीहून निघाले तेव्हा त्यांचे भाऊ, बहीण, आजी आणि विसोवा खेचर, गोरा कुम्हार इत्यादी अनेक समकालीन संतही त्यांच्यासोबत होते. विशेषत: नामदेव आणि ज्ञानदेव यांचे नाते इतके स्नेहपूर्ण होते की, जणू या तीर्थक्षेत्राच्या निमित्ताने ज्ञान आणि कृती दोन्ही एकरूप झाल्यासारखे वाटले.

यात्रेवरून परतताना ज्ञानदेव पंढरपूर मार्गे आळंदीत पोहोचले. याच काळात ज्ञानदेवांनी आपले ‘अभंग’ रचले असावेत असा विद्वानांचा अंदाज आहे. बालकापासून वृद्धापकाळापर्यंत भक्तिमार्गाची ओळख करून देऊन भागवत धर्माची पुनर्स्थापना केल्यानंतर ज्ञानदेवांनी लहान असतानाही आळंदी गावात जिवंत समाधी घेण्याचे ठरवले. अवघ्या २१ वर्षे तीन महिने पाच दिवसांच्या अल्पशा आयुष्यात त्यांनी हे नश्वर जग सोडून समाधी घेतली.

संत नामदेवांनी ज्ञानदेवांच्या समाधीग्रहणाची कथा अतिशय हृदयस्पर्शी शब्दांत लिहिली आहे. आपले गुरू निवृत्तीनाथ यांना अखेरचा नमस्कार केल्यानंतर ज्ञानदेव ज्ञानी ऋषीप्रमाणे समाधी मंदिरात गेले. त्यानंतर गुरूंनी स्वत: समाधीचा दरवाजा बंद केला. ज्ञानेश्वर, ज्यांना ज्ञानेश्वर म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी ही जिवंत समाधी शके १२१७ (वि. संवत १३५३ (इ. स. १२९६)) मार्गशीर्ष वदी (कृष्ण) त्रयोदशीला पुण्यापासून १४ किमी अंतरावर असलेल्या आलिंदी संवत या गावी घेतली. गेला आहे.

माझा अवडता संत मराठीत दीर्घ निबंध | Long Essay On Maza Avadta Sant In Marathi

संत ज्ञानेश्वर, ज्यांना ज्ञानेश्वर महाराज म्हणूनही ओळखले जाते, ते एक गूढ संत आणि तत्त्वज्ञ आहेत जे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून ख्याती आहेत. त्यांच्या शिकवणींचा आणि कार्यांचा मराठी संस्कृती, साहित्य आणि अध्यात्मावर खोलवर परिणाम झाला आहे. या लेखाचा उद्देश प्रभावशाली संताचे जीवन आणि शिकवण आणि आधुनिक समाजासाठी त्यांची प्रासंगिकता शोधणे आहे.

संत ज्ञानेश्वर कोण होते?

संत ज्ञानेश्वरांचा जन्म महाराष्ट्रातील आळंदी या छोट्याशा गावात १२७५ मध्ये झाला. त्यांचा जन्म प्रमुख आध्यात्मिक नेत्यांच्या कुटुंबात झाला आणि चार भावंडांपैकी ते दुसरे होते. अगदी लहानपणापासूनच ते त्यांच्या अपवादात्मक बुद्धिमत्तेसाठी आणि आध्यात्मिक अंतर्दृष्टीसाठी ओळखले जात होते.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

ज्ञानेश्वरांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि बालपण.

ज्ञानेश्वरांचा जन्म नाथ परंपरा म्हणून ओळखल्या जाणार्‍या आध्यात्मिक नेत्यांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील, विठ्ठलपंत हे एक प्रमुख विद्वान होते आणि त्यांचा ज्ञानेश्वरांच्या आध्यात्मिक विकासावर खोल प्रभाव पडला. ज्ञानेश्वरांची भावंडं, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाई हे देखील त्यांच्या स्वतःच्या प्रभावशाली आध्यात्मिक नेते होते.

त्याचे शिक्षण आणि सुरुवातीचे आध्यात्मिक अनुभव

ज्ञानेश्वरांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडून आणि त्यांच्या समाजातील इतर विद्वानांकडून घेतले. तो एक हुशार विद्यार्थी होता आणि त्याने धार्मिक ग्रंथ आणि अध्यात्मिक पद्धतींबद्दलच्या त्याच्या समजात आपल्या समवयस्कांना पटकन मागे टाकले. लहानपणापासूनच त्याला सखोल आध्यात्मिक अनुभव येऊ लागले, ज्यामुळे त्याला आत्मज्ञान आणि आध्यात्मिक मुक्तीसाठी समर्पित जीवनाकडे नेले.

त्यांच्या आध्यात्मिक प्रवासावर त्यांच्या कुटुंबाचा प्रभाव

ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाचा त्यांच्या आध्यात्मिक प्रवासावर खोलवर परिणाम झाला. त्याचे वडील आणि भावंड हे सर्व प्रमुख आध्यात्मिक नेते होते ज्यांनी त्याच्या अध्यात्म आणि परमात्म्याचे स्वरूप समजून घेण्यावर प्रभाव पाडला. त्यांनी त्यांना समाजसेवेचे महत्त्व आणि जातिभेद निर्मूलनाची शिकवण दिली.

त्याच्या पालकांच्या जीवनाबद्दल

संत ज्ञानेश्वरांचे दोन्ही आई-वडील अत्यंत धार्मिक आणि देवभक्त होते. त्यामुळेच चारही मुलं आळंदीत आई-वडिलांच्या देखरेखीखाली वाढत होती. त्यावेळच्या परंपरेनुसार, जेव्हा निवृत्तीनाथ (मुलांपैकी एक) धागा समारंभासाठी आला तेव्हा संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी ब्राह्मणांना ते करण्याची विनंती केली.

तथापि, त्यांनी समारंभ करण्यास नकार दिला कारण ते सर्व या समारंभाच्या विरोधात होते कारण त्यांनी हिंसकपणे सांगितले की हा समारंभ संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करण्यासाठी शास्त्रांच्या आदेशाविरूद्ध आहे.

त्यांच्या वडिलांनी अनेक प्रकारे ब्राह्मणांची विनवणी केली आणि त्यांनी केलेल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी काही सूचना देण्याची विनंती केली. तथापि, ब्राह्मण तयार नव्हते आणि त्यांनी त्याच्या पालकांना परवानगी दिली नाही.

परिणामी, त्यांनी सर्व प्रकारच्या धार्मिक पुस्तकांचा संदर्भ घेतला आणि आपल्या वडिलांना सांगितले की जर त्यांना या महापापातून मुक्त व्हायचे असेल तर विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी यमुना आणि गंगा नदीच्या सत्रात आपल्या प्राणांची आहुती द्यावी. संत ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी ब्राह्मणांचा निर्विवाद निर्णय स्वीकारला कारण त्यांचे वडील खरोखरच ईश्वरभीरु होते.

त्यामुळे त्याच्या पालकांनी प्रयाग येथील नद्यांच्या पवित्र पाण्यात उडी मारली. त्यावेळी सर्व मुले लहान होती. आता निवृत्ती हे इतर सर्व मुलांसाठी पालकांसारखे होते, कारण निवृत्तीनाथ त्यांचा मोठा भाऊ होता. सर्व मुले अतिशय हुशार आणि धार्मिक होती.

त्यांचे साहित्यिक लेखन

संत ज्ञानेश्वर तत्त्वज्ञान शिकले आणि पारंगत झाले. त्यांनी कुंडलिनी योगाची अनेक तंत्रे शिकली, जी नाथ पंथाची खासियत म्हणून घेतली गेली. सर्व मुले अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे या गावात राहायला गेली.

याच ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी आपल्या साहित्य कार्याला सुरुवात केली. त्यांच्या थोरल्या भावाने त्यांना भगवद्गीतेवर भाष्य लिहिण्याची सूचना केली. श्रोत्यांना निवडण्यासाठी ते ज्ञानेश्वरीवर भाषण देत असत, ज्यामध्ये त्यांचे समकालीन संत नामदेव आणि नाथ परंपरेतील काही उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वांचाही समावेश होता.

संत ज्ञानेश्वरांच्या अशा भाषणांमध्ये सच्चिदाननाद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्याला भावार्थ दीपिका असेही म्हणतात. ज्ञानेश्वरी हे दैवी ज्ञानाचे माध्यम होते जे संस्कृतमध्ये अडकले होते आणि सामान्य माणसाच्या प्राकृत भाषेत अनुवादित होते.

अनुवादामुळे ते सर्वांना उपलब्ध झाले. 1287 मध्ये, जेव्हा ते फक्त 12 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी भावार्थ दीपिका म्हणून ओळखले जाणारे भाष्य सुरू केले. अडीच वर्षांनंतर 1290 मध्ये त्यांनी ते पूर्ण केले. या काळात त्यांची नामदेवांशी चांगली मैत्री झाली.

संत ज्ञानेश्वरांचा चिरस्थायी वारसा आजही आध्यात्मिक साधक, विद्वान आणि कलाकारांना प्रेरणा देत आहे. भक्ती, ध्यान आणि समाजसेवेवरील त्यांची शिकवण प्रासंगिक राहते आणि अधिक न्याय्य आणि न्याय्य समाजासाठी ब्लू प्रिंट प्रदान करते. पुढील पिढ्यांसाठी ते आपल्या समुदायांना आकार देत राहतील आणि प्रेरणा देत राहतील याची खात्री करण्यासाठी आपण त्याच्या शिकवणींची पुनरावृत्ती करणे आणि त्याचा पुनर्व्याख्या करणे आवश्यक आहे.

संत ज्ञानेश्वर हे 13व्या शतकात महाराष्ट्रात वास्तव्य करणारे एक गूढ संत आणि तत्त्वज्ञ होते. ते त्यांच्या अपवादात्मक बुद्धिमत्तेसाठी आणि आध्यात्मिक अंतर्दृष्टीसाठी ओळखले जात होते आणि त्यांच्या कार्यांचा भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीवर खोल प्रभाव पडला आहे.

मराठी साहित्यात ज्ञानेश्वरीचे महत्त्व काय होते?

भगवद्गीतेवर मौल्यवान भाष्य देणारी ज्ञानेश्वरी ही मराठी साहित्यातील सर्वात महत्त्वाची रचना आहे. महाराष्ट्राच्या भाषा आणि संस्कृतीवर त्याचा मोठा प्रभाव पडला आहे.

ज्ञानेश्वरांच्या काही शिकवणी काय होत्या?

ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग म्हणून भक्ती, ध्यान आणि समाजसेवेचे महत्त्व शिकवले. त्यांनी परमात्म्याला शरण जाणे आणि आंतरिक शांती आणि आनंदाची स्थिती प्राप्त करणे यावर जोर दिला.

अंतिम विचार | Finale Thought

आशा आहे, तुम्हाला आम्ही दिलेली “ Maza Avadta Sant Essay In Marathi ” ही पोस्ट आवडली असेल, तुमच्या सर्व गरजा या पोस्टच्या माध्यमातून पूर्ण झाल्या असत्या. जर तुम्हाला ही पोस्ट चांगली आणि माहितीपूर्ण वाटली असेल तर ती तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. यासारख्या अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला फॉलो करा. धन्यवाद

हे पण वाचा –

  • फुलांची आत्मकथा निबंध म राठी
  • पावसाळा निबंध मराठी मध्ये
  • वृक्षांचे महत्त्व मराठीत निबंध
  • होळी निबंध मराठीत

नमस्कार मित्रांनो माझे नाव “Rajesh Pahan” आहे मी learningmarathi.in वेबसाइटचा संस्थापक आहे. मी गेली ३ वर्षे ब्लॉगिंग करत आहे, ही वेबसाईट बनवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की मी मराठीत सर्व लोकांना योग्य माहिती देऊ शकेन.

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

IMAGES

  1. माझा आवडता सण होळी निबंध मराठी/Maza Avadta San Holi Marathi Nibandh

    maza avadta san essay in marathi holi

  2. माझा आवडता सण होळी निबंध मराठी

    maza avadta san essay in marathi holi

  3. Maza Avadta Sant Essay in Marathi । Majha Avadta Sant Nibandh

    maza avadta san essay in marathi holi

  4. माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध

    maza avadta san essay in marathi holi

  5. marathi niband on maza aavadta sun

    maza avadta san essay in marathi holi

  6. माझा आवडता सण दिवाळी १० ओळी मराठी निबंध/Maza Avadta San Diwali Nibandh

    maza avadta san essay in marathi holi

VIDEO

  1. मराठी निबंध

  2. दिवाळी निबंध मराठीत || Diwali Marathi Nibandh || Essay On Diwali in Marathi || दीपावली निबंध मराठी

  3. "माझा आवडता सण गणेशोत्सव "निबंध भाषण/Maza avadta San Ganesh utsav Marathi nibandh bhashan

  4. दिवाळी 5 ओळींचा सोपा निबंध

  5. माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी / Diwali nibandh marathi/दिवाळी निबंध मराठी /Maza avadta san diwali

  6. सहल निबंध मराठी

COMMENTS

  1. माझा आवडता सण होळी मराठी निबंध

    आपल्या देशात खूप सण साजरे केले जातात आणि त्या मधे माझा सर्वात आवडता सण आहे होळी. नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता सण होळी मराठी निबंध , Maza Avadta San Holi Essay In Marathi ...

  2. होळी या सणावर उत्तम निबंध मराठी Holi Essay in Marathi

    Holi essay in Marathi, 5 10 points lines on holi in Marathi, Maza avadta san holi essay, my favourite festival holi in marathi for students for class 1,2,3,4,5. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात ...

  3. Maza Avadta San Holi Nibandh

    माझा आवडता सण होळी निबंध इन मराठी | Maza Avadta San Holi Nibandh. मनातील सर्व राग, द्वेष विसरून पुन्हा एकत्र येऊन आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला ...

  4. शिमगोत्सव । कोकणातील खेळे, नमन, पालखी आणि होळी

    शिमगोत्सव । कोकणातील खेळे, नमन, पालखी आणि होळी | Maza Avadta San Holi Essay in Marathi Special Report By Marathi Khabar Team

  5. ५ माझा अवडता सण निबंध

    ५ माझा अवडता सण निबंध | 5 Maza Avadta San Essay In Marathi. December 25, 2023 by Hemaja Burud. आनंद, परंपरा आणि सांस्कृतिक समृद्धीचा ध्वज विणत सण आपल्या हृदयात एक विशेष स्थान ...

  6. माझा आवडता सण होळी

    माझा आवडता सण होळी - Majha Aawadta San Holi - My Favorite Festival Holi Essay In Marathi -वर्णनात्मक, Holi Mahiti In Marathi.

  7. होळी वर मराठी निबंध Essay On Holi In Marathi

    होळी वर १० ओळीत मराठी निबंध 10 Lines On Holi In Marathi. १) होळी हा देशाच्या सर्व भागात दरवर्षी साजरा होणार्‍या रंगांचा उत्सव आहे. २) होळी दरवर्षी ...

  8. माझा आवडता सण निबंध मराठी

    माझा आवडता सण होळी मराठी निबंध maza avadta san holi nibandh in marathi. भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशामध्ये अनेक जाती,धर्माचे पंथाचे लोक ...

  9. My favorite festival is Holi

    My favorite festival is Holi | Maza Avadta San Holi | माझा आवडता सण होळी. Published on: April 26, 2023 by Marathi Essay माझा आवडता सण होळी आहे

  10. माझा आवडता सण

    माझा आवडता सण | Maza Avadta San Essay in Marathi. March 11, 2023 July 1, 2021 by Rohit. ... Categories Essay Tags आवडता ...

  11. Maza Avadta San Essay in Marathi

    Maza Avadta San Essay in Marathi:- मित्रांनो आज आपण माझा आवडता सण नवरात्री निबंध मराठी मध्ये या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला

  12. Best Holi Nibandh Marathi

    Best Holi Nibandh Marathi | होळी सोपा निबंध | Holi Essay In Marathi | maza avadta san holi nibandhholi nibandhholi nibandh marathiहोळी निबंधहोळी ...

  13. HOLI essay in Marathi

    #learnwithnaynateacher #myfavouritefestivalholi #holiessayinmarathi #essaywriting

  14. माझा आवडता सण होळी निबंध मराठी/Maza Avadta San Holi Marathi Nibandh

    maza avadta san holi marathi nibandhHoli nibandh marathiholi nibandh marathi madheholi marathi nibandhholi san nibandh in marathimarathi essay on holiessay o...

  15. माझा आवडता सण मराठी निबंध

    माझा आवडता सण मराठी निबंध | Maza Avadta San Essay in Marathi. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अनेक सण आहेत. प्रत्येक सणाच्या आपले काही स्वतःचे विशिष्ट ...

  16. माझा आवडता सण-होळी मराठी निबंध॥ Maza Avadta San Holi marathi nibandh

    #mazaavadtasan#holinibandh#essayonmyfavouritefestival#essayonmyfavouritefestivalholiinmarathi

  17. Maza Avadta Sant Essay in Marathi

    Maza Avadta Sant Essay in Marathi:- मित्रांनो आज आपण माझा अवडता संत निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा

  18. माझा आवडता सण दिवाळी

    maza aavadata san diwali essay in marathi language maza aavadata san diwali ya vishyavar nibandh maza aavadata san diwali yavar nibandh in marathi माझा आवडता सण दिवाळी माझा आवडता सण दिवाळी माहिती ...

  19. माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध Maza Avadta Sant Essay in Marathi

    by Rahul. Maza Avadta Sant Essay in Marathi माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी असे खालील समर्पक दृष्टांत ज्यांनी दिले तसेच, परमात्मा, जीव आणि जगत ...

  20. माझा आवडता सण दिवाळी वर निबंध

    Maza Avadta San Diwali Yavar Nibandh - माझा आवडता सण दिवाळी या विषयावर निबंध मराठी (लहान निबंध) दिवाळी हा एक भारतीय हिंदू सण आहे जो दरवर्षी ऑक्टोबर किंवा ...

  21. माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध। maza avadta san essay in marathi

    आजच्या या आर्टिकल मध्ये तुम्हाला दिवाळी निबंध मराठी, दिवाळी सणाची माहिती, Diwali Marathi essay, maza avadta san diwali इत्यादी विषयांची माहिती मिळणार आहे ...

  22. माझा आवडता संत निबंध मराठी । Maza Avadta Sant Essay In Marathi

    नमस्कार मित्रांनो आणि नवीन पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये Maza Avadta Sant Essay In Marathi याविषयी माहिती देणार आहोत.